शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदरा तहसीलवर महिलांचा 'घागर मोर्चा'

By admin | Updated: May 14, 2016 00:13 IST

शेकडो योजना राबवूनदेखील आदिवासींच्या नशिबातील मरणयातना संपल्याच नाहीत़ कोसोदूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते़.

तहसीलच्या आवारात फोडल्या घागरी : पाणीटंचाईचा प्रश्न पेटलाचिखलदरा : शेकडो योजना राबवूनदेखील आदिवासींच्या नशिबातील मरणयातना संपल्याच नाहीत़ कोसोदूर अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागते़. माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाच्या विरोधात चिखलदरा तहसीलवर विराट आदिवासी महिलांचा घागर मोर्चा काढून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी तहसीलदारांना पिण्याच्या पाण्यासाठी निवेदन दिले़. मेळघाटातील आदिवासींना आजस्थितीत ४५ डिग्री तापमानात पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागते़ एकीकडे शहरी भागात शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असला तरी मेळघाटातील पाण्याची समस्या मिटलेली नाही़ भरउन्हात आपली तहान भागविण्यासाठी वणवण भटकणाऱ्या आदिवासींना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आ़मदार राजकुमार पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता ठाकरे यांच्या नेतृत्वात चिखलदरा तहसीलवर शासनाच्या विरोधात पाण्यासाठी आदिवासी महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला़ नगर परिषदपासून हा मोर्चा निघाला़ डोक्यावर घागरी घेऊन शेकडो महिला तहसीलकडे वाटचाल करीत होत्या. हे दृश्य पाहून अनेकांचे लक्ष वेधले जात होते़. तहसील कार्यालयात पोहोचून पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याबाबत तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन दिले़. यावेळी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ठाकरे, तालुकाध्यक्ष अरूण सपकाळ, महिला अध्यक्ष किरण घोडके, शंभूदादा खडके, गजेंद्र कस्तुरे, नगरसेवक कल्पना खांडे यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सेवा दल व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़. (तालुका प्रतिनिधी)सरकारच्या रागावर फोडल्या घागरीअनेकदा पाणीटंचाई संदर्भात निवेदने देऊनसुद्धा आज अद्यापपावेतो पाऊल उचलले नाही़ त्यामुळे शासनाच्या व प्रशासनाच्या सरणावर शेवटची मडकी फोडण्यास आम्ही मेळघाटातील रहिवासी तयार आहोत, असे म्हणून तहसील कार्यालयाच्या आवारात मडकी फोडून शासनाचा निषेध करण्यात आला़. आया-बहिणींचा त्रास केव्हा संपणार?गत अनेक वषार्पासून मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळाला नाही. आज आमच्या आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तरीदेखील शासनाला जाग आली नाही. राज्य सरकारला आदिवासींप्रती संवेदना संपल्या असून आमच्या माय बहिणींचा त्रास केव्हा संपणार असा प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता ठाकरे यांनी उपस्थित केला.