शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

दुभाजकांवरील रोपे सुकण्याच्या मार्गावरअमरावती

By admin | Updated: May 9, 2014 23:51 IST

सौंदर्यीकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सौंदर्यीकरणाच्या नावावर लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील विविध दुभाजकांवरील रोपटी नियमित पाणी व योग्य देखभालीअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. शहराच्या विकासाबरोबरच शहर सौंदर्यीकरणासाठी वृक्षारोपण केले जात आहे; मात्र, संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने वृक्षारोपण उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शहरातील मार्ग सुधारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेकडे आहे. रस्तेबांधणी झाल्यावर दुभाजकावर रोपटे लावण्याचे कार्य दोन्ही विभागांद्वारे केले जाते. मात्र, झाडे लावल्यानंतर ती जगवली जात नाहीत. त्यामुळे वृक्ष संगोपनाचा बोजवारा उडाल्याचे दिसते. गेल्या कित्येक दिवसांपासून अमरावतीकर नागरिक हा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. अमरावती-बडनेरा मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते. नागरिक कामानिमित्त सतत ये-जा करतात. सर्वाधिक वर्दळीच्या या मार्गावरील सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. महापालिकेच्या अख्त्यारित येणारा हा मार्ग भकास झाला आहे. मार्गावर ठिकठिकाणी कचरा व घाण साचली आहे. दुभाजकांची अवस्था देखील अत्यंत वाईट आहे. महापालिका आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नसल्याचे दिसून येत. दुभाजकांमध्ये लावलेली झाडे सुकून गेली आहेत. या झाडांना नियमित पाणी मिळत नाही. संगोपनाकडेही दुर्लक्ष केले जाते. महापालिकेने ज्या कंत्राटदारांना या रोपट्यांना पाणी देण्याची जबाबदारी दिली आहे, ते कंत्राटदार या कामात हयगय करीत असल्याचे दिसते. सध्या प्रखर उन्हाळा सुरू आहे. उन्हामुळे झाडे सुकू लागली आहेत. वृक्षारोपणासाठी लाखोंचा खर्च केला जात असेल तर वृक्ष संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज असते. परंतु असे होताना दिसत नाही. त्यामुळे सौंदर्यीकरणाची पार ऐसीतैशी झाली आहे याकडे महापालिकेने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी मागणी नागरिकांची आहे.