शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

अचलपूरची ‘शकुंतला’ लोकसभेच्या अधिवेशनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 5:00 AM

मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या याच समाजाची आहे. रोजगारासाठी कैक दशकांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागते.

ठळक मुद्देमेळघाटातूनच रेल्वेचा मार्ग करा; आदिवासीविरूद्ध राज्यशासन असा सामना ?

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : ब्रिटिशकाळापासून मेळघाटला मध्य प्रांताला जोडणाऱ्या दीडशे वर्षे जुन्या रेल्वे मार्गाला बोटावर मोजण्याएवढ्या राजकारण्यांसाठी शहरी भागात वळविण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा रेल्वे मार्ग मेळघाटातून न नेता अन्य ठिकाणाहून नेण्यासाठी पत्र दिले. ते आदिवासीविरोधी असल्याचा आरोप बुधवारी लोकसभा अधिवेशनादरम्यान जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी केला. अचलपूरच्या नॅरोगेज रेल्वेचा मुद्दाही त्यांनी मांडला.मेळघाटातून अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-देढतलाई ते खंडवा असा ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग परिवर्तीत न करता पूर्वीप्रमाणेच तो मेळघाटातून देण्याची मागणी आदिवासींमधून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मेळघाट हा आदिवासीबहुल परिसर असून, येथे सर्वाधिक संख्या याच समाजाची आहे. रोजगारासाठी कैक दशकांपासून त्यांना मोठ्या प्रमाणात स्थलांतरित व्हावे लागते. शहराच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा दीडशे वर्ष जुना रेल्वे मार्ग आदिवासींसाठी वरदान ठरत आहे. रेल्वेव्यतिरिक्त इतर साधने खर्चीक असल्याने ती आदिवासींंना परवडण्याजोगी नाहीत, असे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे रेल्वेचा शतकोत्तर ब्रिटिशकालीन मार्ग कायम ठेवावा, असे त्या म्हणाल्या. यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या नकाशातून मेळघाट गायब होणार नसल्याचे अभिवचन दिले. मेळघाटातील रेल्वे मार्गाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर आदिवासींमध्ये अस्वस्थता आहे. या रेल्वे मार्गाबद्दलची मावळलेली अपेक्षा आता रेल्वेमंत्र्यांच्या उत्तराने उंचावली आहे.अचलपूरची ‘शकुंतला’ सुरूच ठेवालोकसभेत बुधवारी खासदार नवनीत राणा मेळघाट रेल्वे प्रश्नांवर आक्रमक झाल्या. पश्चिम विदर्भाची ब्रिटिशकालीन नॅरोगेज शकुंतला रेल्वे कष्टकरी, श्रमजीवी, शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. मात्र, ती बंद आहे. त्यामुळे शेतकºयांसह अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मूर्तिजापूर ते अचलपूर मार्गावरील अनेक गावांतील लोकांचे दळणवळणाचे साधन खुंटले आहे. दर्यापूर व अंजनगाव तालुक्यांतील अनेक गावांना लाभ होणार असल्याने शकुंतला रेल्वे सुरू करणे गरजेचे असल्याची मागणी खा. राणा यांनी केली. लवकरच ही रेल्वे सुरू करणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी उत्तर दिले.मुख्यमंत्री आदिवासींचे विरोधी ?अकोला-अकोट-धूळघाट रेल्वे-डाबका-खंडवा रेल्वेचा मार्ग परिवर्र्तित करून मेळघाटबाहेरून रेल्वे मार्ग नेण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिले. ते आदिवासीविरोधी असल्याचा टोलाही खासदारांनी लगावला. जुना मार्ग कायम राहील व शकुंतला एक्सप्रेससुद्धा लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे उत्तर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी खासदारांना उत्तर दिले.

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वेrailwayरेल्वे