शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव परिसरात ८५ टक्के पेरण्या

By admin | Updated: July 9, 2016 00:09 IST

मृग नक्षत्रानंतर आद्राच्या उंदीराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. तालुक्यात आता पर्यत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या असून...

कापसाचा वाढला पेरा : पावसाने बहरली पीके
धामणगाव रेल्वे : मृग नक्षत्रानंतर आद्राच्या उंदीराने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. तालुक्यात आता पर्यत ८५ टक्के पेरण्या आटोपल्या असून ३२ हजार ७९२ हेक्टर मध्ये पेरणी झाली आहे़ यंदा कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे़
धामणगाव तालुक्यात ५५ हजार ४३८ हेक्टर पेरणी योग्य जमीन आहेत़ दरवर्षी प्रमाणे यंदाही कापसाचा पेरा वाढला आहे़ १३ हजार ९५४ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली आहे़ तर सोयाबीन १२ हजार ६१४ हेक्टरात टॅ्रक्टरने पेरणी झाली आहे़ तूर ४ हजार ८२४ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे़ उडीद ७८५ हेक्टर, मूग ६१५ हेक्टर अशी पेरणी झाली असल्याची माहिती पं़स़च्या कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांनी दिली़ तालुक्यात आतापर्यंत २६२़६० मि.मी़ पावसाची नोंद झाली आहे़ दमदार पावसामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केलेली पिके बहरली आहेत़ यंदा पेरणीनंतर पाऊस आल्यामुळे पिके व्यवस्थित असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघावयास मिळत आहे. (तालुका प्रतिनिधी)

बगाजी सागरच्या पाण्याने खरडली जमीन
निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत बगाजी सागर धरणाचे पाणी सलग दोन दिवस सोडण्यात आले़ त्यामुळे नायगाव, आष्टा, सोनोरा काकडे, दिघी महल्ले या गावाच्या नदी शेजारी शेतातील पिके पूर्णत: जमीनसह खरडून गेली आहे़ दरवर्षी या सोडलेल्या पाण्याचा फटका संबधीत गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसतो़ प्रकल्पाचे पाणी सोडण्याची ऐनवेळी दवंडी दिली जात असल्यामुळे उन्हाळ्यात नदीकाठी बसविलेले मोटरपंप काढण्याकरीता अवधी मिळत नाही़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोटरपंप व पाईप या पाण्यात वाहून गेले आहेत़