शहरं
Join us  
Trending Stories
1
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
2
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
3
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
4
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
5
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
6
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
7
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
8
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
9
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
10
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
11
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
12
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
13
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
14
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
15
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
16
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
17
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
20
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार हेक्टर गहू बाधित

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट..

लोकमत विशेष
अमरावती : जिल्ह्यात १० फेब्रुवारीच्या रात्री आलेल्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये ४ हजार हेक्टरमधील ओंबीवर आलेला गहू भुईसपाट झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. या अन्वये बाधित क्षेत्रातील किमान ५० टक्के नुकसान गृहीत धरल्यास गहू पिकाचे ५ कोटी ४० लाखांवर नुकसान झाले. सोबत संत्रा, आंबा, कपाशी व भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वादळासह पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू आहे, असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात कृषी विभागाद्वारा पाहणी सुरू नाही. अधिकारी व कर्मचारी हे जलयुक्त शिवार अभियानाच्या १३ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाला व रात्री ‘गाव मुक्कामाला’ राहणार आहे. परिणामी अधिकारी व कर्मचाऱ्याची वानवा असल्यामुळे शेतीपीक नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले नाही, ही वस्तूस्थिती आहे.
ओंबीवर आलेला गहू जमिनीवर पडल्याने बाधित क्षेत्रामधील गव्हाचा दाणा बारीक पडणार आहे. प्रामुख्याने पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर झाले. हरभऱ्याचे फारसे नुकसान नाही. या पावसाचा हरभऱ्याला फायदा होणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. कापणीवर व मळणीवर आलेल्या तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापणी झालेल्या तुरीच्या गंजी ओल्या झाल्यात. वादळामुळे झाडावरील संत्रा फळे पडली आहे. आंब्या मोहोराचे व भाजी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरिपानंतर रबीचेही नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्हाधिकारी करणार पाहणी
वादळवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले. ओंबीवर आलेला गहू जमिनदोस्त झाला. संत्र्याची फळे पडली. या नुकसानग्रस्त पिकाची पाहणी शनिवार १४ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी किरण गित्ते करणार असल्याची माहिती आमदार अनिल बोंडे यांनी दिली.
सर्वेक्षणास कर्मचाऱ्याअभावी खोळंबा
जलयुक्त शिवार अभियानासाठी अन्य विभागासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची गुरूवारला बैठक, प्रशिक्षण व रात्री ‘गाव मुक्काम’ असल्याने हे कर्मचारी व्यस्त आहेत. परिणामी नुकसान क्षेत्राची पाहणी करण्यासाठी कर्मचारी नसल्याने सर्वेक्षणाचा खोळंबा झाला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
नापिकीचे सत्र सुरू आहे. मागील वर्षी अति पावसाने यंदा पावसाअभावी पीक उद्धवस्त झाले. रबीवर आशा असताना वादळवाऱ्यासह पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे.