शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
5
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
6
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
7
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
8
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
9
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
10
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
11
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
12
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
13
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
14
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
15
Video: जबरदस्त ! मनिष पांडेने घेतला भन्नाट झेल; उडी पाहून विराट कोहलीही झाला अवाक्
16
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
17
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
18
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
19
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
20
HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी मोठी बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ; परिवहन मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वरुडमध्ये १७ शेतकऱ्यांची आत्महत्या

By admin | Updated: December 13, 2014 22:31 IST

तीन वर्षांपासून वरुड तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट तसेच कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे.

संजय खासबागे - वरूड
तीन वर्षांपासून वरुड तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट तसेच कोरडा दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्यांपुढे समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. नैराश्यामुळे मागील ७ महिन्यांत तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडेवारीरवून स्पष्ट झाले आहे.
सन २०१०पासून सतत सुरू असलेल्या निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांची अवस्था विदारक झाली व शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे. अतिवृष्टी, गारपीट आणि नंतर कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून दुबार, तिबार पेरणी करुनही निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती व्यवसाय पूर्णत: डबघाईस आला आहे. बदलत्या वातावरणामनुळे उत्पादनात कमालीची घट झाली. तरीही शेतकऱ्यांनी पर्याय व्यवसाय नसल्यामुळे शेती व्यवसाय सुरुच ठेवला. परंतु उत्पादनाला हमीभाव मिळत नसल्याने लागवडीचा खर्चही निघणे दुरापास्त झाले आहे. १४ एप्रिल ते ६ आॅक्टोबर २०१४ पर्यंत तब्बल १७ शेतकऱ्यांनी या कारणांमुळे आपली जीवनयात्रा संपविली.
दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी, गारपिटीने पिके बुडाली. संत्रा गळाला. मृग नक्षत्रामध्ये मृगाच्या पावसाने तब्बल दोन महिने दडी मारल्याने खरीप पिके बुडाली. यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली. केवळ शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुला-मुलींची लग्न, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बँकांच्या कृषी कर्जाचा भरणा कसा करावा, सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.