शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिका खासगी दवाखान्यांना उपलब्ध व्हाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST

********************** ** १०८ रुग्णवाहिकेचे कंट्रोलर करतात प्रायव्हेट, सरकारी असा भेदभाव *******†**†*********** दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना ...

**********************

** १०८ रुग्णवाहिकेचे कंट्रोलर करतात प्रायव्हेट, सरकारी असा भेदभाव

*******†**†***********

दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना तालुक्यात शासकीय कोविड हाॕॅस्पिटल नसताना गंभीर परिस्थिती झालेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयातून नेण्यासाठी नकार देणाऱ्या १०८ ॲम्बुलन्सचा काय उपयोग? रुग्णावाहिका शासकीय रुग्ण, खासगी रुग्ण असा भेद करू शकते काय, असा प्रश्न नुकताच एका कोविड रुग्णाबाबत निर्माण झाला होता. शेवटी त्या रुग्णास खासगी वाहनाने परतवाडा येथे हलविण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की १० दिवसांपूर्वी दयानंदनगर येथील गरीब कुटुंबातील हातमजुरी करणारे शिवदास पायघन हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांना भंडारज येथील खासगी कोविड हाॕॅस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना आठ दिवसानंतर सुटी मिळाली. परंतु घरी येताच दुसऱ्याच दिवशीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांच्या परिवाराने त्यांना शहरातीलच एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना परतवाडा किंवा अमरावती कोविड सेंटरमध्ये नेण्याचे सुचवले असता सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे यांनी शहरातील काही खासगी रुग्णवाहिकेसाठी फोन लावून प्रयत्न केले; परंतु उपलब्ध झाली नाही. शेवटी शासनाचे १०८ या नंबरवर संपर्क केला असता रुग्णवाहिकेच्या कंट्रोलरकडून आम्ही पेशंटला फक्त सरकारी कोविड सेंटरवरूनच नेतो, प्रायव्हेट सेंटरवरून नेत नाही, असे उत्तर मिळाले. रुग्णाची वाईट स्थिती पाहता अखेर रुग्णाला खासगी गाडीने परतवाडा येथे न्यावे लागले.

यावरून शासनाची रुग्णवाहिका ही लोकांचे जीव वाचविण्याचे काम करत आहे की रुग्णाला मारण्याचे काम करत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशी परिस्थिती पुन्हा घडू नये व रुग्ण हा प्रायव्हेट दवाखान्यात असो की सरकारी दवाखान्यात असो, त्या रुग्णाला १०८ या रुग्णवाहिकेने सेवा उपलब्ध करून द्यावी. या विषयीचे निवेदन तहसीलदार जगताप यांच्यामार्फत जिल्हाधिका-यांना सामाजिक कार्यकर्ते मनोहर मुरकुटे, सचिन जायदे यांनी दिले. जिल्हाधिकारी या गंभीर बाबीवर काय निर्णय घेतात, याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.