शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

World No Tobaco Day : तंबाखू दरवर्षी घेतो १० लाखांवर जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:35 IST

देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणत: १० लाख लोकांचा मृत्यू होतो.

ठळक मुद्देदर ५ व्यक्तींमधील एका व्यक्तीच्या मरणाचे कारण तंबाखू आहे. अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात कोरडी पाने, सिगारेट, बिडी, चिलम, गुटखा आदी अशा विविध रूपात तंबाखू सेवन केले जाते. देशात दरवर्षी रस्ता किंवा इतर अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणत: १० लाख लोकांचा मृत्यू होतो. दर ५ व्यक्तींमधील एका व्यक्तीच्या मरणाचे कारण तंबाखू आहे. अशी माहिती लोकसेवा संघाचे अध्यक्ष डॉ. योगेय साहू यांनी दिली.तंबाखू सेवनामुळे अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. यामध्ये अधरोस्कोलोरोसिस, हार्ट अटॅक, पेरिफेरल वॅस्कुलर डिसिज, ब्रेन स्ट्रोक, अ‍ॅम्पायसिमा लंग, कॅन्सर, फिटल डॅमेज, लॉरेंजियल कॅन्सर, डेंटल प्रॉब्लेम, ल्युकोप्लाकिया, ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस, ओरल कॅन्सर तसेच प्रती दिवशी २० सिगारेट ओढणारा व्यक्ती आपले आयुष्य १० वर्षांनी कमी करून घेतो. गुटखा खाणाऱ्या व्यक्तीमध्ये वारंवार तोंड येणे, तोंडात लाल व पांढरे चट्टे दिसणे, जेवण करताना तिखट लागणे, तोंड कमी उघडणे, तोंडातील एखादी जखम एक महिन्यापेक्षा जास्त न बसणे, तोंडात एखादी अनावश्यक गाठ आढळणे, जिभेला असणारी एखादी गाठ होणे, आवाजात झालेला बदल, लाळग्रंथीच्या जागेवर सूज येणे आदी लक्षणे हळूहळू दिसून येतात, असेही त्यांचे म्हणने आहे.

तंबाखूतील विषारी द्रव व त्याचे शरीरावर होणारे परिणामनिकोटिन : कॅन्सर, रक्तचाप,कार्बन मोनोक्साईड : हृदयरोग, अंधत्व, दमा.मार्श गॅस : शक्तिहीनता, नपुंसकताअमोनिया : मंद पाचनशक्ती, पित्ताशय, विकृतीकोलोडॉन : स्नायूमध्ये विकृती, डोके दुखणेपापरीडीन: अजीर्ण, डोळ्यांची जळजळकार्बालिक अ‍ॅसिड : अनिद्रा, विस्मरणपरफेरॉल: अशक्तपणाअँजेलिन सायनोझोन: रक्तविकारफॉस्फोरल प्रोटिक अ‍ॅसिड : उदासीनता, टीबीयोग करायोग करून आपल्या मनाचा कठोर निश्चय करा व संकल्प शक्ती वाढवून या नशेचा परित्याग करा. उपचार म्हणून शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी करता येते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होतो; पण वेळेवर उपचार केल्यास बरा होऊ शकतो.तंबाखूपासून दूर राहावे‘तंबाखूमुक्त भारत’ ही संकल्पना डॉ. साहू तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्राच्या माध्यमातून गेल्या २० वर्षांपासून राबवित असून, भारतातील हे पहिले केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. तंबाखू दिनानिमित्त तंबाखू त्यागाचा संकल्प करावा, असे आवाहन करत तरुणांनी तंबाखूपासून दूर राहावे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTobacco Banतंबाखू बंदी