शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 10:11 AM

पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्ज वाटपाच्या नियोजनात शेतकरी कर्जमाफीसाठी माहिती अपलोड झालेले १,०९,६४५ व गतवर्षी कर्ज वाटप केलेल्या ५५,६९१ शेतकरी मिळून चालू वर्षात १ लाख ५० हजार खातेधारकांना चालू वर्षात कर्ज वाटप करण्याची तयारी आहे. त्याचवेळी १ एप्रिलपासून वाटप सुरू करणे अपेक्षित असताना इतक्या दिवसांत आतापर्यंत केवळ ८ हजार म्हणजेच ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पेरणीला केवळ ३० ते ४० दिवसांचा कालावधी उरल्याने उर्वरित शेतकºयांना पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.गत काही वर्षांत पीक कर्ज भरण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकºयांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २२७ बँकांमध्ये असलेल्या १,८४,०२० शेतकरी खातेदारांपैकी ६९,८५९ शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ४३९ कोटी रक्कम शासनाकडून जमा झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पात्र १,६५,३३६ पैकी केवळ १ लाख ५० हजार शेतकºयांनाच १,२०० कोटी रुपये पीक कर्ज देण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना खरीप तर ७,५०० शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित आहे; मात्र चालू वर्षात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी, लॉकडाउनच्या काळात अनेक सेवा विस्कळीत झाल्या.त्यामध्ये बँकांच्या कामकाजालाही फटका बसला. ही परिस्थिती असली तरी खरिपाची पेरणी तोंडावर येत आहे. पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यास आधीच उशीर झाला. त्यातही लॉकडाउनचे नियम पाळत वाटप करावे लागत आहे.या सर्व अडथळ्यांमुळे कर्ज वाटपाची गती मंदावली. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृ त बँका मिळून केवळ ८ हजार शेतकºयांना वाटप झाले आहे. त्यातही सहा हजार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार आहेत. राष्ट्रीयीकृ त बँकांनी केवळ दोन हजार शेतकºयांना वाटप केले. ही परिस्थिती पाहता पेरणीला सुरुवात होईपर्यंत किती शेतकºयांच्या हातात कर्जाची रक्कम मिळेल, ही बाब सध्यातरी अनिश्चित आहे. ं

७४ हजार शेतकºयांचा वांधाकर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अद्याप ७४,३५५ शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळे चालू वर्षात ते शेतकरी कर्ज वाटपासाठी पात्र ठरतात की नाही, याबाबतचा संभ्रमही आता शेतकºयांमध्ये आहे. या शेतकºयांबाबत निर्णय न झाल्यास त्यांना गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.नियोजनाप्रमाणे शेतकºयांना कर्ज वाटप सुरू आहे. पेरणीच्या काळापूर्वी वाटपाची गती वाढविण्याचे बँकांना सांगितले आहे. त्यानुसार सर्वांना कर्ज वाटप होणार आहे.- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरी