शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किटचा तुटवडा; व्यापाऱ्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 10:41 AM

Akola News भर उन्हात रांगेत उभे असणाऱ्या शेकडाे व्यापाऱ्यांचे हाल हाेऊन त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले.

अकाेला: दुकाने खुली करण्यासाठी व्यापारी व कामगारांना काेविड चाचणी बंधनकारक केल्यानंतर जिल्हा व महापालिका प्रशासनाने कारवाइचा बडगा उगारण्यापूर्वी चाचणी केंद्रांचे नियाेजन करणे भाग हाेते. तसे न करता केवळ दुकानांवर कारवाइ करण्याला प्राधान्य देण्यात आले. याप्रकाराला स्थानिक वर्तमान पत्रांनी वाचा फाेडल्यानंतर जिल्हा व मनपा प्रशासनाने शनिवारी विविध भागात चाचणी केंद्र उघडले; मात्र टेस्टिंग किटचा तुटवडा निर्माण झाल्याने भर उन्हात रांगेत उभे असणाऱ्या शेकडाे व्यापाऱ्यांचे हाल हाेऊन त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले.

अकाेलेकरांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाच्या प्रादूर्भावात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्हाप्रशासनाने २३ फेब्रुवारी पासून जिल्ह्यासह शहरात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. व्यापार ठप्प हाेण्याच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली असता जिल्हाप्रशासनाने काेविड चाचणी बंधनकारक केली. अर्थात व्यापारी व कामगारांची संख्या लक्षात घेता चाचणीसाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने चाचणी केंद्रांची संख्या वाढवून टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे अपेक्षित हाेते. तसे न करता व्यावसायिकांवर कारवाइचा बडगा उगारला.

 

अवघ्या तीन तासांत गाशा गुंडाळला!

व्यापारी व कामगारांना काेविड चाचणी बंधनकारक केल्यामुळे चाचणी केंद्रांसमाेर शुक्रवारी व शनिवारी व्यापाऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या. शनिवारी मनपाच्या चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किट संपल्याने अवघ्या तीन तासांत गाशा गुंडाळल्याचे समाेर आले. अनेक चाचणी केंद्रांवर किमान १०० व त्यापेक्षा अधिक किट उपलब्ध असताना त्याठिकाणी किमान ७०० ते ८०० व्यापाऱी व कामगारांनी गर्दी केल्याचे चित्र हाेते. गीता नगरमध्ये भर उन्हात व्यापारी,कामगार तासन् तास ताटकळत उभे हाेते.

 

नागरिक संतापले; अधिकाऱ्यांशी वाद

भाजपचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेऊन जवाहर नगर चाैकात चाचणी केंद्र सुरु केले. मनपाच्या वैद्यकीय पथकाकडे ५०० टेस्टिंग किट हाेत्या. परंतु पीपीइ किट घातलेल्या महिला कर्मचाऱ्याला उन्हाचा त्रास हाेऊ लागल्याने २०० नागरिकांची चाचणी केली. त्यामुळे रांगेतील नागरिकांनी नगरसेवकासह मनपा अधिकाऱ्यांसाेबत वाद घातला. जुने शहरातील कस्तुरबा रुग्णालयातही किट संपल्याने संतप्त नागरिकांनी आराेग्य कमर्चाऱ्यांसाेबत वाद घातला.

 

प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार

जिल्हा व मनपा प्रशासनाने सुरु केलेल्या चाचणी केंद्रांवर स्वॅब घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव हाेता. संगणकात नाेंदणी करण्यासाठी नागरी आराेग्य केंद्रांकडून मनपाला डाटा एन्ट्री ऑपरेटरची मागणी केली जात असताना मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रॅपिड अन्टिजेन टेस्ट केल्यानंतर अनेकांना अहवाल प्राप्त हाेत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत व्यापाऱ्यांवर दबावतंत्र कशासाठी,असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

यंत्रणांची उडाली धांदल

जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी डाॅ.निलेश अपार, मनपातर्फे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यासंपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. परंतु प्रत्यक्षात चाचणी केंद्र सुरू केल्यानंतर या दाेन्ही यंत्रणांची धांदल उडाल्याची परिस्थिती असून यामध्ये नाहक व्यापारी वर्ग भरडल्या जात असल्याचे चित्र समाेर आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला