शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शालेय विद्यार्थी ज्वारी, बाजरी व नाचणीपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:20 AM

Students Mid day meal आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल होऊ शकला नसल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला : शालेय पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तांदुळात २५ टक्के कपात करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी यापैकी एका आहाराचा समावेश करण्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे राज्यातील स्वायत्त संस्थांना निर्देश होते. यासंदर्भात स्वायत्त संस्थांनी भारतीय अन्न महामंडळाकडे मागणी नोंदविणे अपेक्षित असताना स्वायत्त संस्थांनी शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल होऊ शकला नसल्याचे चित्र समोर आले आहे.शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी महिन्यात पार पडलेल्या बैठकीत जिल्हा परिषदांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी पोषण आहारात बदल करण्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा पार पडली होती. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नव्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार असल्याने चालू शैक्षणिक सत्रादरम्यान विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातील तांदुळाचे प्रमाण २५ टक्के कमी करून त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणी या तीनपैकी एका पदार्थाचा आहारात समाविष्ट करण्याचे स्वायत्त संस्थांना स्पष्ट निर्देश होते. यासंदर्भात शिक्षण संचालकांनी (प्राथमिक) राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पोषण आहारात बदल करण्याची सूचना दिली होती. शालेय पोषण आहार योजना केंद्र पुरस्कृत असल्यामुळे यासंदर्भातील आहाराची मागणी भारतीय अन्न महामंडळाकडे करावी लागणार होती; परंतु आजपर्यंतही विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात बदल करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.सामाजिक संघटनांची शासनाकडे धावसर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाºया काही सामाजिक संघटनांनी यासंदर्भात शासनाकडे धाव घेतल्याची माहिती आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पोषण आहाराच्या संदर्भात लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीSchoolशाळा