शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेड आता उतरणार राजकारणात!

By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST

प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्याशी बातचीत.

अकोला : परिवर्तनवादी चळवळीच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते वेगवेगळ्य़ा पक्षात जात असतील, तर हे चळवळीचे अपयश आहे. पुरोगामी चळवळीत परिपक्व झालेल्या कार्यकर्त्यांंनी राजकीय चळवळ गतिमान करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पावले उचलली असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे शंभर टक्के समाजकारण व राजकारण या शिवसूत्राची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी राजकारणात उतरत असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी अकोला येथे 'लोकमत'शी बोलताना दिली.मराठा सेवा संघाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आखरे रविवारी अकोल्यात आले होते, तेव्हा त्यांनी संभाजी ब्रिगेडने राजकारणासह पाच सूत्री कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगितले.

प्रश्न-समाजकारण व राजकारण कसे करणार?उत्तर- मराठा, बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याची खरी गरज आहे. संभाजी ब्रिगेड ते करीत आहेच, पण राजकीय सत्तेच्या माध्यमातून यात आमूलाग्र बदल घडवून आणता येतो. हे तितकेच सत्य आहे . पुरागोमी चळवळीतील कार्यकर्त्यांंना इतर राजकीय पक्षात त्या पक्षाच्या अजेंड्यानुसार काम करावे लागते. येथे मात्र त्यांचा शंभर टक्के पुरोगामी चळवळीला गतिमान करण्यास मोठा हात भार लागणार आहे.

प्रश्न-राजकीय चळवळीची सुरुवात केली का? उत्तर- ग्रामपंचायत निवडणुकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांंनी चांगली कामगिरी केली. बुलडाणा जिल्हय़ात चांगले चित्र आहे. राजकीय चळवळीला अधिक व्यापक करण्यासाठी योजना आखली जात आहे. सध्या शेतकर्‍यांचे प्रश्न हाती घेतले आहेत. मराठवाड्यात शेतकरी मेळावे, मोर्चे काढले जात आहेत. या मोर्चाला शेतकर्‍यांचा उत्स्फू र्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रश्न- पाचसूत्री कार्यक्रम कोणता ?उत्तर- मराठा-बहुजन समाजाला प्रगतीची कवाडे उघडायची असतील तर शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्याची गरज असून, या क्षेत्रात आपले विचाराचे लोक येणे गरजेचे आहे. म्हणजेच शिक्षण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण आणि प्रचार, प्रसार माध्यम सत्ता बहुजन समाजाच्या हाती येणे गरजेचे आहे. हेच आमचे ध्येय असून, त्यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

प्रश्न- बहुजन समाजाला एकत्र कसे करणार? उत्तर- राज्यात आम्ही परिवर्तनवादी चळवळीच्या माध्यमातून समोर आल्याने इतर सर्वच पुरोगामी चळवळीला बळ मिळालं आहे. आता मराठा समाज ताकदीने पुढे येत असूून, या चळवळीत स्वत:ला झोकून देत आहे. खरे तर मराठय़ांचा या अगोदर गैरवापर झाला. त्यांच्यात सरंजामशाहीचा अविर्भाव ठासून भरवला होता, पण आम्ही तो अविर्भाव वैचारिक प्रबोधनातून काढला, काढत आहोत. बहुजन समाजाला जोडताना, आम्ही मराठा समाजातील पोट जातींचा बिमोड करण्यासाठी पाऊल टाकले आहे. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यशही येत आहे.

प्रश्न- वैचारिक प्रबोधन नेमके कोणतं करता?उत्तर- या देशाला प्रगतीकडे नेणार्‍या पुरोगामी महामानवांचे विचार समाजापर्यंंत नेण्याचे काम करीत असून, सर्व समाज एकत्र कसा नांदेल आणि प्रत्येकाला समान न्याय कसा मिळेल, हा आमचा उद्देश आहे. कर्मकांड, अंधश्रद्धेतून हा समाज बाहेर काढण्यासाठी त्यांच्या समोर पर्याय ठेवत आहोत. प्रवास खडतर आहे, पण तो करावाच लागणार आहे.