शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
5
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
6
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
7
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
8
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
9
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
10
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
11
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
12
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
13
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
14
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
15
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
16
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
17
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
18
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
19
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
20
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड

जून-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:13 IST

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे. चांगल्या पावसामुळे यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे; परंतु पावसाचे वितरण मात्र असमान आहे. यावर्षी जूनमध्ये सरासरी ९२.४ मिमी तर जुलैै महिन्यात ९३.४ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त आहे. गतवर्षी जूनमध्ये केवळ ६०.१४ मिमी आणि जुलैमध्ये ८८.६ मिमी पाऊस होता. त्यामुळे यावर्षी चांगल्या पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असली तरी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात सरासरी १३६.९ पावसाची गरज होती. प्रत्यक्षात ७८.४ मिमी म्हणजेच ५७.३ टक्केपाऊस पडला होता. हा पाऊस जवळपास ४३ टक्के कमी होता. यावर्षी जून महिन्यात पावसाची सरासरी १३६.९ मिमी आहे. प्रत्यक्षात १२६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे यावर्षी मागच्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ९२ टक्के पाऊस पडला आहे. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात १९७.८ मिमी ८८.६ टक्के पाऊस झाला. केवळ १२ टक्के कमी नोंद झाली. यावर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात २०६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ९३ टक्के असून, केवळ ७ टक्के कमी आहे.जिल्हाभरात एकाच वेळी सार्वत्रिक पाऊस पडला नसला तरी, पावसाने सर्वच तालुक्यात गाठलेली सरासरी पिकांसाठी पोषक ठरली आहे. पिकांवर आलेली कीड विशेषत: कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, चक्रीभुंगाचे संकट आले आहे तर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा तालुक्यासह विदर्भातील अनेक भागात मूग पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे मूग लागवड शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग पिकावर नांगर फिरवून शेतातलं पीक उद्ध्वस्त करण्याचा पवित्रा घेतला आहे.दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तेल्हारा, बाळापूर तालुक्यात जाऊन मूग पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मूग पिकाचे काही नमुने संकलीत करून ते तपासणीसाठी बँगलोर येथील व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविल्याचपाणीटंचाई नाही?जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत झालेला समाधानकारक पाऊस आणि पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये पुरेसा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेही पाणीटंचाईची परिस्थिती नाही. उन्हाळ्यापर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे नाहीत असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे म्हणाले.दुबार पेरणीचे संकटबोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. महाबीजने या बियाण्यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतकºयांचे संपूर्ण नियोजनच बोगस सोयाबीन बियाण्यांनी कोलमोडून टाकले आहे.आज काटेपूर्णाचे ४ गेट उघडणार; १५० क्युसेक विसर्गअकोला काटेपूर्णा धरणात ८५ टक्के जलसंचय झाल्याने उद्या १ आॅगस्ट रोजी चार गेट उघडण्याचा निर्णय पाटबंघारे विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दोन गेट उघडले जाणार असून, दोन गेट दुपारी १ वाजता उघडण्यात येणार आहेत.यामधून १५० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.

काटेपूर्णा धरणात यावर्षी ८५ टक्के जलसंचय झाल्याने या धरणांतर्गत शेतीला यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. वान धरणात यावर्षी आतापर्यंत केवळ ४१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. आॅगस्ट महिन्यात हे धरण भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर वान धरणाचा निर्णय घेण्यात येईल.-चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसweatherहवामानDamधरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र