शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जून-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:13 IST

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे. चांगल्या पावसामुळे यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे; परंतु पावसाचे वितरण मात्र असमान आहे. यावर्षी जूनमध्ये सरासरी ९२.४ मिमी तर जुलैै महिन्यात ९३.४ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त आहे. गतवर्षी जूनमध्ये केवळ ६०.१४ मिमी आणि जुलैमध्ये ८८.६ मिमी पाऊस होता. त्यामुळे यावर्षी चांगल्या पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असली तरी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात सरासरी १३६.९ पावसाची गरज होती. प्रत्यक्षात ७८.४ मिमी म्हणजेच ५७.३ टक्केपाऊस पडला होता. हा पाऊस जवळपास ४३ टक्के कमी होता. यावर्षी जून महिन्यात पावसाची सरासरी १३६.९ मिमी आहे. प्रत्यक्षात १२६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे यावर्षी मागच्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ९२ टक्के पाऊस पडला आहे. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात १९७.८ मिमी ८८.६ टक्के पाऊस झाला. केवळ १२ टक्के कमी नोंद झाली. यावर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात २०६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ९३ टक्के असून, केवळ ७ टक्के कमी आहे.जिल्हाभरात एकाच वेळी सार्वत्रिक पाऊस पडला नसला तरी, पावसाने सर्वच तालुक्यात गाठलेली सरासरी पिकांसाठी पोषक ठरली आहे. पिकांवर आलेली कीड विशेषत: कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, चक्रीभुंगाचे संकट आले आहे तर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा तालुक्यासह विदर्भातील अनेक भागात मूग पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे मूग लागवड शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग पिकावर नांगर फिरवून शेतातलं पीक उद्ध्वस्त करण्याचा पवित्रा घेतला आहे.दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तेल्हारा, बाळापूर तालुक्यात जाऊन मूग पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मूग पिकाचे काही नमुने संकलीत करून ते तपासणीसाठी बँगलोर येथील व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविल्याचपाणीटंचाई नाही?जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत झालेला समाधानकारक पाऊस आणि पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये पुरेसा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेही पाणीटंचाईची परिस्थिती नाही. उन्हाळ्यापर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे नाहीत असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे म्हणाले.दुबार पेरणीचे संकटबोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. महाबीजने या बियाण्यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतकºयांचे संपूर्ण नियोजनच बोगस सोयाबीन बियाण्यांनी कोलमोडून टाकले आहे.आज काटेपूर्णाचे ४ गेट उघडणार; १५० क्युसेक विसर्गअकोला काटेपूर्णा धरणात ८५ टक्के जलसंचय झाल्याने उद्या १ आॅगस्ट रोजी चार गेट उघडण्याचा निर्णय पाटबंघारे विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दोन गेट उघडले जाणार असून, दोन गेट दुपारी १ वाजता उघडण्यात येणार आहेत.यामधून १५० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.

काटेपूर्णा धरणात यावर्षी ८५ टक्के जलसंचय झाल्याने या धरणांतर्गत शेतीला यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. वान धरणात यावर्षी आतापर्यंत केवळ ४१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. आॅगस्ट महिन्यात हे धरण भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर वान धरणाचा निर्णय घेण्यात येईल.-चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसweatherहवामानDamधरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र