शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

जून-जुलैमध्ये गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 10:13 IST

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस सरासरीच्या लगत पोहोचला असून, ही समाधानकारक स्थिती मानली जात आहे. चांगल्या पावसामुळे यावर्षी पिकांची स्थिती चांगली आहे; परंतु पावसाचे वितरण मात्र असमान आहे. यावर्षी जूनमध्ये सरासरी ९२.४ मिमी तर जुलैै महिन्यात ९३.४ मिमी पाऊस पडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त आहे. गतवर्षी जूनमध्ये केवळ ६०.१४ मिमी आणि जुलैमध्ये ८८.६ मिमी पाऊस होता. त्यामुळे यावर्षी चांगल्या पावसामुळे पिकांची स्थिती उत्तम असली तरी किडीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागच्या वर्षी जून महिन्यात सरासरी १३६.९ पावसाची गरज होती. प्रत्यक्षात ७८.४ मिमी म्हणजेच ५७.३ टक्केपाऊस पडला होता. हा पाऊस जवळपास ४३ टक्के कमी होता. यावर्षी जून महिन्यात पावसाची सरासरी १३६.९ मिमी आहे. प्रत्यक्षात १२६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजे यावर्षी मागच्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ९२ टक्के पाऊस पडला आहे. मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात १९७.८ मिमी ८८.६ टक्के पाऊस झाला. केवळ १२ टक्के कमी नोंद झाली. यावर्षीच्या जुलै महिन्यात सरासरी २२३.२ मिमी पावसाची गरज होती. प्रत्यक्षात २०६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस ९३ टक्के असून, केवळ ७ टक्के कमी आहे.जिल्हाभरात एकाच वेळी सार्वत्रिक पाऊस पडला नसला तरी, पावसाने सर्वच तालुक्यात गाठलेली सरासरी पिकांसाठी पोषक ठरली आहे. पिकांवर आलेली कीड विशेषत: कपाशीवरील गुलाबी बोंड अळी, चक्रीभुंगाचे संकट आले आहे तर आता अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा तालुक्यासह विदर्भातील अनेक भागात मूग पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे मूग लागवड शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काही शेतकºयांनी मूग पिकावर नांगर फिरवून शेतातलं पीक उद्ध्वस्त करण्याचा पवित्रा घेतला आहे.दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी तेल्हारा, बाळापूर तालुक्यात जाऊन मूग पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मूग पिकाचे काही नमुने संकलीत करून ते तपासणीसाठी बँगलोर येथील व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविल्याचपाणीटंचाई नाही?जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत झालेला समाधानकारक पाऊस आणि पाणीपुरवठा करणाºया धरणांमध्ये पुरेसा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कुठेही पाणीटंचाईची परिस्थिती नाही. उन्हाळ्यापर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होण्याची चिन्हे नाहीत असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे म्हणाले.दुबार पेरणीचे संकटबोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले. महाबीजने या बियाण्यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र शेतकºयांचे संपूर्ण नियोजनच बोगस सोयाबीन बियाण्यांनी कोलमोडून टाकले आहे.आज काटेपूर्णाचे ४ गेट उघडणार; १५० क्युसेक विसर्गअकोला काटेपूर्णा धरणात ८५ टक्के जलसंचय झाल्याने उद्या १ आॅगस्ट रोजी चार गेट उघडण्याचा निर्णय पाटबंघारे विभागाने घेतला आहे. या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दोन गेट उघडले जाणार असून, दोन गेट दुपारी १ वाजता उघडण्यात येणार आहेत.यामधून १५० क्युसेक विसर्ग करण्यात येणार आहे.

काटेपूर्णा धरणात यावर्षी ८५ टक्के जलसंचय झाल्याने या धरणांतर्गत शेतीला यावर्षी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. वान धरणात यावर्षी आतापर्यंत केवळ ४१ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. आॅगस्ट महिन्यात हे धरण भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर वान धरणाचा निर्णय घेण्यात येईल.-चिन्मय वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसweatherहवामानDamधरणFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र