शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानातून मोठी जलक्रांती शक्य

By admin | Updated: May 22, 2015 01:44 IST

जलपुरूष राजेंद्रसिंह यांचे प्रतिपादन, आकोट येथे जलसभा.

आकोट: जल व जनशक्तीला जोडणारे हे जलयुक्त शिवार अभियान आहे. या अभियानामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्यास मोठय़ा प्रमाणात जलक्रांती घडू शकते, असा आशावाद मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत महसूल विभागाच्यावतीने २१ मे रोजी स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात सरपंच, पोलीस पाटील, जि. प., पं. स., ग्रा. पं. सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्ते, शेतकर्‍यांकरिता जलसभा पार पडली. या जलसभेला मॅगसेसे पुरस्कार प्राप्त राजेंद्रसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण शिंदे तर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार प्रदीप पाटील, सचिन पाटील, डॉ. नीलेश हेडा, कृषी व जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले, पं. स. सभापती अंजली तायडे, गटविकास अधिकारी कालीदास तापी, तालुका कृषी अधिकारी मंगेश ठाकरे, रामराजे घोडवे, केशवराव मेतकर, गजेंद्र वानखडे, हरिभाऊ वाघोडे, गोपाल कोल्हे, तेल्हाराचे मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांची उपस्थित होती. यावेळी जलशिवार योजनेंतर्गत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आकोट व तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायती तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तिपत्र व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला. आकोट विभागातील कामाचा प्रभाव पाहून जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी एसडीओ शैलेश हिंगे तसेच जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जलतज्ज्ञ डॉ. सुभाष टाले यांनी हा बझाडा झोन परिसर असल्याने पावसाळ्यातील ४२ टक्के पाणी समुद्रात जाऊन मिसळते. नदी, सरोवर, जमिनीतील ओलावा व नैसर्गिक ओलावा पाण्याचे स्रोत आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरात व शेतात जलव्यवस्थापन करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी, शेतकर्‍यांनी व नागरिकांनी जलचळवळ उभी केल्यानं लोकसहभागातून मोठे काम या भागात झाले.