शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: आसाममध्ये पुन्हा 'हिमंत' सरकार; आज शपथविधी
3
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
4
अण्णाद्रमुक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?, विधानसभेत आमदारांमध्ये दोन गट; मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा देण्यावरून वाद
5
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
6
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
7
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
8
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
9
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
10
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
11
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
12
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
13
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
14
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
15
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
16
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
17
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
18
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
19
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
20
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून धान्यच मिळाले नाही

By admin | Updated: June 3, 2014 20:53 IST

मूर्तिजापूर : प्रत्येक गरिबाची अन्नाची गरज भागावी, या उदात्त हेतूने शासनाने शिधापत्रिकेद्वारे सरकारी स्वस्त दुकानांमार्फत धान्य पुरवठा करण्याची योजना अनेक वर्षांपासून सुरू केली आहे. मात्र पुरवठा विभाग व सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्यच मिळाले नाही. परिणामी पात्र लाभार्थींवर उपासमारीची पाळी आली आहे.

मूर्तिजापूर : पुरवठा विभाग व सरकारी स्वस्त धान्य दुकानदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गत दोन महिन्यांपासून तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्यच मिळाले नाही. परिणामी पात्र लाभार्थींवर उपासमारीची पाळी आली आहे. अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. शासन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी अडीच रुपये किलो दराने ३० किलो गहू व तांदूळ पुरविते. तसेच जानेवारी २०१४ पासून गरीब व पात्र कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेत सामील करून त्यांना २ रु. किलो दराने गहू व ३ रु. किलो दराने तांदूळ वितरित करण्यात येत आहेत.असे असले तरी गत दोन महिन्यांपासून बीपीएल व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना धान्यच मिळाले नाही. गत तीन महिन्यांपूर्वी तालुका धान्य पुरवठा विभागामार्फत एपीएल कार्डधारकांसाठी शासनाकडून धान्य उपलब्ध नसताना अनावधानाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून चालान भरण्यात आले होते व त्यांना धान्यही वितरित करण्यात आले होते. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास येताच तालुक्यातील सर्व शासकीय दुकानदारांकडून धान्य लगेच परत मागण्यात आले; परंतु धान्य दुकानदारांनी चालानपोटी भरलेली रक्कम त्यांना परत देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढला. परिणामी त्यांनी त्यानंतरच्या मालासाठी चालानच भरले नाही. त्यामुळे बीपीएल व अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रभारी तहसीलदार पी. के. देशमुख यांनी काही अडचणींमुळे गत दोन महिन्यांचे धान्य वितरित करता आले नसल्याचे मान्य करून येत्या दोन-तीन दिवसामध्येच दोन महिन्याचे धान्य वितरित केले जाईल असे सांगीतले.