शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला मिळत आहे चार हजारावर भाव

By admin | Updated: April 3, 2015 02:27 IST

शेतक-‍यांजवळचा कापूस संपला; वाढलेले भाव व्यापा-‍यांच्या हिताचे.

नाना हिवराळे /खामगाव : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी व रूईच्या भावामध्ये वाढ झाल्याने कापसाची मागणी वाढली आहे. पर्यायाने कापसाच्या भावातही क्विंटलमागे ३00 ते ४00 रूपये दराने वाढ झाली आहे; परंतु सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या घरातच कापूस नसल्याने या वाढत्या भावाचा फायदा केवळ व्यापार्‍यांना होणार असल्याचे दिसून येते. पांढर्‍या सोन्याकडे शेतकर्‍यांचे हमी पीक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात गारपीट, नैसर्गिक आपत्ती आणि अत्यल्प पावसामुळे कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच बाजारातही कपाशीला शेतकर्‍यांच्या अपेक्षाएवढा भाव मिळत नसल्याने कपाशीचे पीक घेणे परवडेनासे झाले आहे. यावर्षीच्या २0१४-१५ च्या हंगामात कपाशीला शासनाकडून ३ हजार ९५0 ते ४ हजार ५0 रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर झाला होता. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ व भारतीय कपास निगम (सीसीआय) यांच्यावतीने कपाशीची खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होती. खामगाव हे कापसाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असल्याने येथे कपाशीची नेहमीच विक्रमी आवक असते. यावर्षी पणन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात जळगाव जामोद, शेगाव व देऊळगाव राजा येथे खरेदी केंद्र उघडण्यात आले होते. मार्च अखेर पणन महासंघाची जिल्ह्यात १ लाख ७ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. तर सीसीआयच्यावतीने खामगाव, नांदुरा, मलकापूर व जळगाव जामोद या चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. एकट्या खामगाव केंद्रावर सीसीआयने ३ लाख ५४ हजार ४३७ क्विंटल कापूस खरेदी केली. शेतकर्‍यांचे ऑनलाईन पेमेंट होऊन शेतकर्‍यांना कापसाचे १४१ कोटी ५४ लाख ४५ हजार ६७0 रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. शेतकर्‍यांना ४ हजार ७५0 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त भाव यावर्षी मिळालाच नाही. गतवर्षी पाच हजारापेक्षा जास्त भाव कापसाला मिळाला होता. शेतकर्‍यांच्या घरातील कापूस विकल्यानंतर आता मात्र कापसाचे भाव वाढले आहेत. सद्यस्थितीत ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रुपये प्रतिक्विंंटल कापसाला भाव मिळत आहे; परंतु जवळपास ९५ टक्के शेतकर्‍यांच्या घरातून कापूस हद्दपार झाला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक चणचण भासत असल्याने शेतकर्‍यांनी पडेल भावात कापूस विकला आहे. ३ हजार ५00 ते ३ हजार ६00 रुपये दराने शेतकर्‍यांनी कापूस विकला; मात्र आता ४ हजार ३00 ते ४ हजार ४00 रूपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वाढत्या भावाचा शेतकर्‍यांना फटका बसला असून, वाढलेला भाव व्यापार्‍यांच्या पथ्यावर पडणारा आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकर्‍यांना वाढत्या भावापासून वंचित राहावे लागले आहे.