शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-मुंबईतअडकलेल्या विद्यार्थ्यांनाही स्वगृही येण्याची परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:57 IST

पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.

अकोला : लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना येत्या आठ दिवसात परत आणल्या जाईल व ३ मे पर्यंत त्यांना सुखरूप घरि पोहचविले जाईल असे महाराष्ट्र राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केले आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच याच धर्तीवर पुणे व मुंबई येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.केंद्र सरकारने विदेशात अडकलेल्या विद्यार्थी व लोकांना विशेष विमानाने भारतातर आणले शिवाय त्यांना त्यांच्या घरि पोहचविले. ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु पुण्या मुंबई सारख्या शहरात महाराष्ट्राच्या ईतर भागातुन आलेल्या व अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात मात्र सरकार उदासिन असल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातुन गरीब विद्यार्थी विद्यार्थी पुणे व मुंबई येथे शिकतात. आजही या महानगरांमध्ये हजारो विद्यार्थी अडकलेले आहेत. लॉकडाडनमुळे या विद्यार्थ्यांचे जेवनाचे हाल होत आहेत. सर्वच मुलांना हाताने स्वयंपाक करणे जमत नाही. अशावेळी त्यांना उपाशी राहण्याशिवाय पर्याय नाही. हे सर्व विद्यार्थी गेल्या २२ मार्च पासून तिथेच अडकलेले आहेत. सद्या ते करोना संक्रमणा पासून सुरक्षित आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता खाण्यापीण्याच्या वस्तूंकरीता त्यांना बाहेर पडावे लागत असल्याने त्यांना करोना संसगार्चा धोका कायम आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी आणण्याची व्यवस्था करण्यास तयार आहेत; परंतु शासनाला या गरीब विद्यार्थ्यांचा विसर पडल्याचे दिसुन येते हा प्रकार त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्यासारखा आहे. हवे तर त्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी करा; परंतु त्यांना घरी जाण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून ते सर्व विद्यार्थी करोनाच्या हॉटस्पॉट सारख्या भागातुन त्यांच्या घरि सुखरुप राहतील व प्रशासनाचा देखील ताण कमी होईल अशी मागणी वंचित बहुजन आघाडीची असल्याचे प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी