शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
4
ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, AIMIM नगरसेवकाची मदत; निदाच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
5
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
6
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
7
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
8
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
9
जेन-झी: हाऊ डेअर यू? - तुमची हिंमतच कशी झाली?
10
जगभर : राष्ट्राध्यक्ष होण्याआधी शेख मोहम्मद हॉटेलमध्ये होते 'वेटर'!
11
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
12
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
13
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
14
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
15
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
16
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
17
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
18
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
19
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
20
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना कमी होताच कामगार कामावर परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST

श्रीरामपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच बाहेरील राज्यात आपापल्या घरी गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. त्यामुळे उद्योगाची ...

श्रीरामपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच बाहेरील राज्यात आपापल्या घरी गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. त्यामुळे उद्योगाची चाके पुन्हा गतिमान झाली आहेत. मात्र, हॉटेल व्यवसाय अजूनही पूर्वपदावर आलेला नाही. त्यामुळे ५० टक्के कामगार कामावर रुजू होऊ शकलेले नाहीत.

नगर जिल्ह्यात कोरोना संख्या नियंत्रणात आली आहे. प्रतिदिन तीन हजारांवर गेलेली रुग्णांची संख्या आता ५०० च्या घरात आली आहे. त्यामुळे घरी परतलेले परप्रांतीय कामगार जिल्ह्यात दाखल झाले आहेत. एमआयडीसीतील उद्योगांची रुतलेली चाके फिरू लागली आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारने उद्योगांना लॉकडाऊनमधून सूट दिलेली होती. मात्र, कामगारांअभावी उद्योगांना आर्थिक फटका बसला होता. आता पुन्हा शंभर टक्के उत्पादन क्षमता गाठण्यात यश आले आहे.

----------

हॉटेल व्यवसाय अस्थिर

हॉटेल व्यवसायांना अद्यापही नियंत्रणमुक्त करण्यात आलेले नाही. सायंकाळी चार नंतर केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. बैठक क्षमता अद्यापही कमी आहे. त्यामुळे केवळ ५० टक्के कामगारांची आवश्यकता असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली. उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल येथे कामगार त्यांच्या गावीच थांबलेले आहेत. ते शेतातील मजुरी कामांकडे वळले आहेत, अशी माहिती हॉटेल व्यावसायिकांनी दिली.

-----------

माझा ग्लास वर्कचा व्यवसाय आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कारागीर माझ्याकडे काम करतात. ते सर्व लोक लॉकडाऊननंतर कामावर हजर झाले आहेत. पूर्ण क्षमतेने व्यवसाय सुरू आहे.

- मारुती बिंगले, श्रीरामपूर.

---------

चायनीज खाद्यपदार्थ तयार करणारे कारागीर अजूनही हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यांना काम देण्यासाठी स्थिती नाही. सरकारने पूर्ण वेळ हॉटेल व्यवसाय चालविण्यास परवानगी द्यावी.

- अजय गुप्ता, हॉटेल चालक, श्रीरामपूर.

----------