शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

विखेंच्या घरात ‘कमळ’ का फुलले?, बंडाचा जुनाच वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 17:31 IST

काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेकदा घडलेला आहे. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.

ठळक मुद्देकाय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?का सोडली नाही पवारांनी जागा?विखे यांना भाजपा मानवेल का?

- सुधीर लंके

काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेकदा घडलेला आहे. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय हे ‘अहमदनगर’ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करु इच्छित आहे. ही जागा राष्टÑवादीने सोडली नाही म्हणून सुजय यांनी बंड करत भाजपा प्रवेश केला. विखे यांचा हा भाजपा प्रवेश काँग्रेस थांबवू शकली असती. पवारांना काँग्रेस आग्रह करु शकली असती. मात्र, पवार व काँग्रेस या दोघांनीही विखे यांना एकप्रकारे दुर्लक्षित केले. विखे परिवाराची काँग्रेस विरोधी व बंडखोर भूमिका हेच कारण यामागे असू शकते.

काय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?सुजय यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे हे काँग्रेसचे मोठे नेते होते. मात्र त्यांनी अनेकदा काँग्रेसमध्ये बंड केले. तोच कित्ता त्यांच्या नातवाने गिरविला आहे. बाळासाहेब विखे हे आठ वेळा खासदार झाले. मात्र, क्षमता असूनही त्यांना काँग्रेसमध्ये मंत्रिपद कधीही मिळाले नाही. त्यांना व त्यांचे पुत्र राधाकृष्ण यांना पहिला लाल दिवा शिवसेनेने दिला. काँग्रेस विखे यांच्याकडे नेहमी संशयाने पाहत आली. बाळासाहेब विखे हे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे समर्थक होते. शंकरराव चव्हाण व पवार या संघर्षात विखे हे सतत शंकरराव यांच्यासोबत होते. १९७८ मध्ये शंकरराव चव्हाण, विखे, खताळ पाटील यांनी ‘मसका’ काँग्रेस काढली. शरद पवारांच्या ‘पुलोद‘ सरकारमध्ये ‘मसका’चे शंकरराव चव्हाण हे समाविष्ट होते. तेव्हाच पवार-विखे थोडी जवळीक होती. एरव्ही ती नव्हती. बाळासाहेब विखे यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता होती. मात्र, त्यांनी आपले वजन सतत शंकरराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळेच आजही अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे यांच्यात सलगी आहे. पवारांना विखे यांनीही कधीही साथ दिलेली नाही.राजीव गांंधी पंतप्रधान असताना बाळासाहेब विखे यांनी त्यांच्याविरोधात ‘फोरम’ निर्माण केला होता. विखे हे त्यावेळी काँग्रेसच्या ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये गेले. त्यातून त्यांची १९९१ ची लोकसभा उमेदवारी कापली गेली होती. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत विखे यांनी नगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. त्या निवडणुकीत विखे पराभूत झाले. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांनी गडाख व पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्या खटल्यात गडाखांची निवड रद्द होऊन गडाख व पवार या दोघांवरही न्यायालयाने ठपका ठेवला होता. पवार त्यावेळी पुढे सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्रही ठरले असते. त्यांच्यावर नामुष्की ओढावली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले. पवारांवर हे संकट विखे यांनी आणले. ती सल पवारांच्या मनात आजही दिसते.१९९१ च्या या खटल्याच्या पार्श्वभूमीवर १९९५ मध्ये राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी विखे परिवाराचे पुन्हा काँग्रेसचे सूत्र जुळले. मात्र, काही महिन्यातच राधाकृष्ण विखे शिवसेनेत जाऊन मंत्री झाले. विखे पिता-पुत्रांनी पुन्हा बंड करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. १९९८ च्या निवडणुकीत बाळासाहेब विखे हे नगर मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर खासदार झाले. तेही केंद्रात मंत्री झाले.शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात बंडखोरी करत राष्टÑवादी काँग्रेस काढली. त्यावेळी विखे शिवसेनेत होते. त्यांनी त्यावेळी सेनेकडून राष्ट्रवादी विरोधात कोपरगाव लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत विजय मिळविला. २००४ ला दोन्ही काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी विखे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पवारांनी त्यावेळी त्यांच्यासाठी कोपरगावची जागा काँग्रेसला सोडली होती. म्हणजे पवारांनी एकदा विखे यांच्यासाठी जागा सोडल्याचा इतिहासही आहे. मात्र, आता नगरची जागा पवारांनी सोडली नाही या कारणावरुन सुजय विखे यांनी बंडखोरी केली.

का सोडली नाही पवारांनी जागा?विखे हे कुठल्याही पक्षात असले तरी ते स्वत:चा गट वाढविण्यास प्राधान्य देतात. सर्व पक्षात त्यांचे कार्यकर्ते आहेत. जिकडे विखे तो आमचा पक्ष अशी या कार्यकर्त्यांची भूमिका असते. त्यामुळे विखे यांचे नगर जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात एक उपद्रवमूल्य आहे. त्या जोरावर ते सर्वांना वाकविण्याचा व आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विखे यांच्यासाठी नगरची लोकसभेची जागा सोडल्यास ते खासदार होतील. नंतर राष्टÑवादीला उपद्रव देतील ही भीती पवार यांना असावी. त्यामुळे त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला.

विखे यांना भाजपा मानवेल का?सुजय विखे हे भाजपामधून विजयी झाल्यास त्यांचा प्रवास सुकर राहील. अन्यथा विखे यांना नगर जिल्ह्यात मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. विखेंच्या भाजपा प्रवेशामुळे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आता नगर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेतृत्व येण्याची शक्यता आहे. राज्यातही काँग्रेस राधाकृष्ण विखे यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांना आता अधिक महत्त्व देईल. त्यामुळे थोरात यांच्यासाठी आता काँग्रेसच्या नेतृत्वाची संधी वाढली आहे.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगरBJPभाजपा