शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विखेंच्या घरात ‘कमळ’ का फुलले?, बंडाचा जुनाच वारसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 17:31 IST

काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेकदा घडलेला आहे. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.

ठळक मुद्देकाय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?का सोडली नाही पवारांनी जागा?विखे यांना भाजपा मानवेल का?

- सुधीर लंके

काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेकदा घडलेला आहे. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय हे ‘अहमदनगर’ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करु इच्छित आहे. ही जागा राष्टÑवादीने सोडली नाही म्हणून सुजय यांनी बंड करत भाजपा प्रवेश केला. विखे यांचा हा भाजपा प्रवेश काँग्रेस थांबवू शकली असती. पवारांना काँग्रेस आग्रह करु शकली असती. मात्र, पवार व काँग्रेस या दोघांनीही विखे यांना एकप्रकारे दुर्लक्षित केले. विखे परिवाराची काँग्रेस विरोधी व बंडखोर भूमिका हेच कारण यामागे असू शकते.

काय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?सुजय यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे हे काँग्रेसचे मोठे नेते होते. मात्र त्यांनी अनेकदा काँग्रेसमध्ये बंड केले. तोच कित्ता त्यांच्या नातवाने गिरविला आहे. बाळासाहेब विखे हे आठ वेळा खासदार झाले. मात्र, क्षमता असूनही त्यांना काँग्रेसमध्ये मंत्रिपद कधीही मिळाले नाही. त्यांना व त्यांचे पुत्र राधाकृष्ण यांना पहिला लाल दिवा शिवसेनेने दिला. काँग्रेस विखे यांच्याकडे नेहमी संशयाने पाहत आली. बाळासाहेब विखे हे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे समर्थक होते. शंकरराव चव्हाण व पवार या संघर्षात विखे हे सतत शंकरराव यांच्यासोबत होते. १९७८ मध्ये शंकरराव चव्हाण, विखे, खताळ पाटील यांनी ‘मसका’ काँग्रेस काढली. शरद पवारांच्या ‘पुलोद‘ सरकारमध्ये ‘मसका’चे शंकरराव चव्हाण हे समाविष्ट होते. तेव्हाच पवार-विखे थोडी जवळीक होती. एरव्ही ती नव्हती. बाळासाहेब विखे यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता होती. मात्र, त्यांनी आपले वजन सतत शंकरराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळेच आजही अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे यांच्यात सलगी आहे. पवारांना विखे यांनीही कधीही साथ दिलेली नाही.राजीव गांंधी पंतप्रधान असताना बाळासाहेब विखे यांनी त्यांच्याविरोधात ‘फोरम’ निर्माण केला होता. विखे हे त्यावेळी काँग्रेसच्या ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये गेले. त्यातून त्यांची १९९१ ची लोकसभा उमेदवारी कापली गेली होती. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत विखे यांनी नगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. त्या निवडणुकीत विखे पराभूत झाले. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांनी गडाख व पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्या खटल्यात गडाखांची निवड रद्द होऊन गडाख व पवार या दोघांवरही न्यायालयाने ठपका ठेवला होता. पवार त्यावेळी पुढे सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्रही ठरले असते. त्यांच्यावर नामुष्की ओढावली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले. पवारांवर हे संकट विखे यांनी आणले. ती सल पवारांच्या मनात आजही दिसते.१९९१ च्या या खटल्याच्या पार्श्वभूमीवर १९९५ मध्ये राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी विखे परिवाराचे पुन्हा काँग्रेसचे सूत्र जुळले. मात्र, काही महिन्यातच राधाकृष्ण विखे शिवसेनेत जाऊन मंत्री झाले. विखे पिता-पुत्रांनी पुन्हा बंड करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. १९९८ च्या निवडणुकीत बाळासाहेब विखे हे नगर मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर खासदार झाले. तेही केंद्रात मंत्री झाले.शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात बंडखोरी करत राष्टÑवादी काँग्रेस काढली. त्यावेळी विखे शिवसेनेत होते. त्यांनी त्यावेळी सेनेकडून राष्ट्रवादी विरोधात कोपरगाव लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत विजय मिळविला. २००४ ला दोन्ही काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी विखे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पवारांनी त्यावेळी त्यांच्यासाठी कोपरगावची जागा काँग्रेसला सोडली होती. म्हणजे पवारांनी एकदा विखे यांच्यासाठी जागा सोडल्याचा इतिहासही आहे. मात्र, आता नगरची जागा पवारांनी सोडली नाही या कारणावरुन सुजय विखे यांनी बंडखोरी केली.

का सोडली नाही पवारांनी जागा?विखे हे कुठल्याही पक्षात असले तरी ते स्वत:चा गट वाढविण्यास प्राधान्य देतात. सर्व पक्षात त्यांचे कार्यकर्ते आहेत. जिकडे विखे तो आमचा पक्ष अशी या कार्यकर्त्यांची भूमिका असते. त्यामुळे विखे यांचे नगर जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात एक उपद्रवमूल्य आहे. त्या जोरावर ते सर्वांना वाकविण्याचा व आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विखे यांच्यासाठी नगरची लोकसभेची जागा सोडल्यास ते खासदार होतील. नंतर राष्टÑवादीला उपद्रव देतील ही भीती पवार यांना असावी. त्यामुळे त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला.

विखे यांना भाजपा मानवेल का?सुजय विखे हे भाजपामधून विजयी झाल्यास त्यांचा प्रवास सुकर राहील. अन्यथा विखे यांना नगर जिल्ह्यात मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. विखेंच्या भाजपा प्रवेशामुळे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आता नगर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेतृत्व येण्याची शक्यता आहे. राज्यातही काँग्रेस राधाकृष्ण विखे यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांना आता अधिक महत्त्व देईल. त्यामुळे थोरात यांच्यासाठी आता काँग्रेसच्या नेतृत्वाची संधी वाढली आहे.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगरBJPभाजपा