शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
2
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
3
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
4
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
5
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
6
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
7
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
8
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
9
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
10
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
11
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
12
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
13
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
14
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
15
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
16
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
17
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
18
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
19
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
20
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतीचे आरक्षण आताच कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST

विसापूर :श्रीगोंदा तालुक्यातील नुकत्याच ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुका पार पडल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ...

विसापूर :श्रीगोंदा तालुक्यातील नुकत्याच ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुका पार पडल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार नुकतेच सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण तालुक्यातील ८७ पैकी नुकत्याच निवडणूक झालेल्या ५९ ग्रामपंचायतीसाठी जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र आरक्षण जाहीर करताना पुढे दोन वर्षांत होणाऱ्या २८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदासाठी आरक्षण आताच कसे जाहीर करण्यात आले? असा सवाल पिंपळगाव पिसाचे माजी सरपंच प्रमोद जगताप यांनी उपस्थित केला आहे.

आता ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही ठिकाणी निवडणुकीपूर्वी झालेले सरपंचपदासाठीचे आरक्षण रद्द करण्यात येऊन निवडणुकीनंतर पुन्हा आरक्षण सोडत काढण्याबाबत ग्रामविकास खात्याने आदेश काढला. त्यानुसार तालुका पातळीवरील यंत्रणेने या आरक्षणाबरोबर पुढे दोन वर्षांत होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपदांचे आरक्षण जाहीर करून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. वास्तविक पाहता शासनाचे आरक्षण सोडतीचे निर्देश सर्व टप्प्यातील ग्रामपंचायतीचे निवडणूकांना लागू असणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुढे निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपदांचे जाहीर करण्यात आलेले आरक्षण रद्द करून संबंधित ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यावर त्यावेळी आरक्षण जाहीर करण्यात यावे, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.