शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गाव विकासासाठी लोक एकत्र आले तर चुकीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:15 IST

जामखेड : गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ गटतट विसरून एकत्र येत असतील, ग्रामपंचायत बिनविरोध करत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? ...

जामखेड : गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ गटतट विसरून एकत्र येत असतील, ग्रामपंचायत बिनविरोध करत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? गावात गटतट असावेत, असा त्यांचा हेतू असावा, असे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यामागे प्रामाणिक हेतू होता, असेही पवार यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायत करणाऱ्या गावांना ३० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर नगर येथे प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निधी देण्यावरच आक्षेप घेतला होता. त्यांच्या टीकेला पवार यांनी उत्तर दिले. पवार म्हणाले की, कोरोना काळात लोकांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर गटतट असतात. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांसाठी खर्च वाढतो व तणाव वाढतो. दोन गट असल्याने विकासकामात अडथळा येतो. विकास खुंटतो. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्यांना भरीव निधी दिला तर त्यात गैर काय? कदाचित त्यांचा हेतू वेगळा असावा. त्यांना वाटत असेल, वेगळ्या पद्धतीने पैसे वाटत असतील; मात्र तसे काही नाही. सर्वजण एकत्र येऊन गटतट विसरून निवडणूक बिनविरोध होत असेल त्यात गैर काय? असे पवार यांनी सांगितले.

----

काय म्हणाले होते शिंदे..

ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन आहे. असे प्रलोभन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील, अशी टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली होती.