शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या जीवावर बेततोय साखर कारखान्यांचा वेळकाढूपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:22 IST

अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने साखर आयुक्त कार्यालयाने साखर ...

अहमदनगर : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने साखर आयुक्त कार्यालयाने साखर कारखान्यांशी बोलणी सुरू केली आहे. मात्र साखर कारखाने वेळकाढूपणा करत असून, त्यांचा हा वेळकाढूपणा सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर बेतत आहे, असे मत आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ व्यक्त करीत आहेत.

कोरोनाने जिल्ह्यात कहर माजविला आहे. संकट काळात साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्रकल्प उभारून रुग्णांना वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आर्जव सरकारने कारखान्यांना केली आहे. मात्र, संगमनेर, प्रवरा आणि काेळपेवाडी या सहकारी साखर कारखान्यांनी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करण्याबाबत कळवले आहे. मात्र, त्यांचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही. तर उर्वरित कारखान्यांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. सहकारी साखर कारखान्यांनी नफ्या-तोट्याचा विचार न करता सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, कोरोनाच्या संकट काळात मात्र सहकारी साखर कारखाने हात आखडता घेताना दिसत आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने इथेनॉल प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन केले. पण, इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मिती करणे खर्चिक आहे. तसेच ही पद्धत वेळखाऊ आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करणे हा पर्याय पुढे आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो. या खर्चासाठी संचालक मंडळाची परवानगी लागेल. त्यासाठी संचालक मंडळांची बैठक घेऊन, बैठकीत काय ठरते, ते पाहू, अशी कारणे कारखाना व्यवस्थापनाकडून पुढे केले जात आहे.

हवेतून ऑक्सिजन करण्याचा पहिला प्रकल्प जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज १ टन २५० किलो लीटर ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील साखर कारखाने उभे करू शकतात. त्यासाठी इथेनॉलच्या प्रकल्पात बदल करण्याची गरज नाही. हा प्रकल्प पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने उभा करू शकतात, असे काहींचे म्हणणे आहे.

....

शरद पवारांच्या सूचनेलाही

राष्ट्रवादी नेत्यांकडून बगल

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांनी कोरोनाच्या संकट काळात मदत करावी. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. साखर कारखान्यांनी ऑक्सिजनचे प्रकल्प उभे करावेत, अशी सूचना पवार यांनी केली होती. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. परंतु, या कारखान्यांनीही पवार यांच्या सूचनेला सोयीस्करित्या बगल दिल्याचे यावरून दिसते.