शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जमावाकडून मारहाण;पोलिसांवर दगडफेक

By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST

चंदनापुरी : स्मशानभूमीत संशयास्पद फिरणाऱ्या अज्ञात दोघा तरूणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण करीत दुचाकी पेटविल्याची घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे घडली.

चंदनापुरी : स्मशानभूमीत संशयास्पद फिरणाऱ्या अज्ञात दोघा तरूणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण करीत दुचाकी पेटविल्याची घटना संगमनेर तालुक्यातील झोळे येथे घडली. पोलीस दोन तास उशिरा आल्याने त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यात उपनिरीक्षकासह २ पोलिस जखमी झाले. मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झोळे गावच्या स्मशानभूमीमध्ये रवींद्र बापू खैरनार (वय ३२) व संजय पांडूरंग खैरनार (वय४० दोघे, रा. नॉर्दन ब्रँच, श्रीरामपूर) हे संशयास्पद फिरत असल्याचे काही महिलांनी पाहिल्यावर इतर ग्रामस्थांना कळविले. ग्रामस्थांनी दोघांना गावात आणल्यावर ते चोर असल्याचे सांगण्यात आले. चोर पकडल्याची बातमी सर्वत्र पसरताच झोळे, खांडगाव, हिवरगाव पावसा, चंदनापुरी, यशवंतनगर, रायतेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा जमाव गावात जमला. संतप्त जमावाने दोघांना बेदम मारहाण केली. मात्र मारहाणीत विपरीत घटना घडू नये म्हणून पोलीस पाटील अण्णासाहेब काळे, उपसरपंच किरण नवले, मधुकर वाळे, जिजाबा एरंडे, राहुल नवले, रंगनाथ खर्डे, सुभाष गुंजाळ आदींनी दोघांना वाचवून मारूती मंदिरात कोंडून ठेवले. तालुका पोलीस निरीक्षक संजय भामरे यांना घटनेची माहिती देवूनही पोलीस दोन तास उशिरा गावात पोहोचले. त्यामुळे तणाव निर्माण होवून बाहेरील संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, सहाय्यक फौजदार पोपट खोसे व कॉन्स्टेबल धुळाजी भिसे जखमी झाले. तसेच वाहनाच्या काचा फुटल्या. जमावाला आवरणे शक्य नसल्याचे पाहून आणखी कुमक मागवण्यात आली. भामरे व शहर पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी हे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करून मंदिरात कोंडलेल्या तरूणांना ताब्यात घेतले. पकडलेले दोघेजण स्मशानभूमीतील राखेतून सोने सापडवित असल्याचा संशय आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर) पोलीस दूरध्वनी बंदतालुका पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक (२२५४३३) गेल्या १५ दिवसांपासून बंद आहे. घटनेची माहिती कळविण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. दूरध्वनी चालू असता तर पुढील अनर्थ टळला असता, अशा प्रतिक्रिया परिसरातील ग्रामस्थांनी दिल्या.