शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:24 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे गत दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. राज्यभरात निर्बंध शिथिल ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे गत दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. राज्यभरात निर्बंध शिथिल केल्यानंतर बंद असलेली परिवहन मंडळाची बससेवा साधारण दोन महिन्यांपूर्वी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकाला इच्छित स्थळी पोहोचवणारी लालपरी आता रस्त्यांवर धावू लागली आहे. लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

संगमनेर आगारातून पुणे, औरगांबाद, मालेगाव, मुंबई, चाळीसगाव, बारामती, जालना, गोंदवले, अहमदनगर, नाशिक या लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या नियमित सुरू झाल्या आहेत. तसेच कोपरगाव, अकोले, साकूर येथे जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. इतरही आगारांच्या गाड्या संगमनेरात येतात. प्रवासी संख्या वाढत असल्याने बसेसच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात येत आहेत.

-------------

संगमनेरात ३६ बसेसचे कोटिंग पूर्ण

अहमदनगर जिल्ह्यातील ४०० एसटी बसेसला ॲटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होणार आहे. संगमनेर आगारातील ५३ बसेसला कोटिंग करण्यात येणार असून आतापर्यंत जवळजवळ ३६ बसेसचे कोंटिग पूर्ण झाले आहे. कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांचा धोका यामुळे टळणार आहे. असे संगमनेर आगाराचे प्रमुख नीलेश करंजकर यांनी सांगितले.

---------

बसेसच्या फेऱ्या फेऱ्यांची संख्या

संगमनेर-पुणे ७

संगमनेर-औरंगाबाद ५

संगमनेर-मालेगाव २

संगमनेर-मुंबई ३

संगमनेर-चाळीसगाव १

संगमनेर-बारामती १

संगमनेर-जालना १

संगमनेर-गोंदवले १

संगमनेर-अहमदनगर ६

संगमनेर-नाशिक ४

----------------------------

सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती

अहमदनगर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधांमुळे अनेकांची जिल्हास्तरावरील शासकीय कार्यालयांमधील असलेली कामे रखडली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून बसला पसंती दिली जाते आहे. तसेच संगमनेरातून बड्या शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील अधिक आहे.

___

संगमनेर आगारातून बसेसच्या दररोज ११२ फेऱ्या होतात. त्यात लांब पल्ल्याच्या, मध्यम लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण बसेसच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. बसने प्रवास करण्याला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. प्रवाशांनी प्रवास करताना तोंडाला मास्क लावाला, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे.

नीलेश करंजकर, आगारप्रमख, संगमनेर

----------------

star 1070star 1070