शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

के के रेंजच्या फायरिंगसाठी जमीन अधिग्रहणास नगर, राहुरी, पारनेर तालुक्यांतून तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 13:04 IST

राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील शेतक-यांच्या जमिनी संरक्षण खात्याने घेतल्या आहेत. आता अजून २५ हजार हेक्टर विस्तारीकणाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राहुरीतील १७, नगर तालुुक्यातील ५ आणि पारनेर तालुक्यातील ५ गावे बाधित होणार आहेत. हा अन्याय असून, या विरोधात संघटित विरोध करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्दे१९४१ मध्ये सरावासाठी म्हणून के.के. रेंज सुरू केले. १९५६ मध्ये कायमस्वरूपी जवळपास ४० हजार एकर क्षेत्र संरक्षण खात्याने संपादन करून घेतले.त्यात राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील शेतक-यांच्या जमिनी संरक्षण खात्याने घेतल्या आहेत.आताही २५ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतत्यामुळे राहुरीतील १७, नगर तालुुक्यातील ५ आणि पारनेर तालुक्यातील ५ गावे बाधित होणार आहेत.

अहमदनगर : भारतीय संरक्षण खात्याच्या लष्कराचे सरावक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणा-या के.के. रेंजच्या विस्ताराचे सरकारचे प्रयत्न आहेत. यापूर्वीच राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील शेतक-यांच्या जमिनी संरक्षण खात्याने घेतल्या आहेत. आता अजून २५ हजार हेक्टर विस्तारीकणाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राहुरीतील १७, नगर तालुुक्यातील ५ आणि पारनेर तालुक्यातील ५ गावे बाधित होणार आहेत. हा अन्याय असून, या विरोधात संघटित विरोध करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला.माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या बाजार समितीमधील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस दादा पाटील शेळके, आ. विजय औटी, पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे, प्रताप शेळके, काशिनाथ दाते, परसराम भगत यांच्यासह बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.दादा पाटील शेळके म्हणाले, १९४१ मध्ये सरावासाठी म्हणून के.के. रेंज सुरू केले. १९५६ मध्ये कायमस्वरूपी जवळपास ४० हजार एकर क्षेत्र संरक्षण खात्याने कवडीमोल भावात संपादन करून घेतले. आताही २५ हजार हेक्टर क्षेत्र नव्याने संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पारनेर, नगर आणि राहुरीतील २७ गावांतील लोकांना विस्तापित होण्याची वेळ येणार आहे. त्याला आता आम्ही सर्वजण एकत्रित येत संघटित विरोध करणार आहोत. यावेळी बोलताना आ. औटी म्हणाले, की राज्य सरकारकडे २ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र पडीक आहे. अनेक प्रयत्न करूनही त्यातील एक एकरही लागवडीखाली आणता आलेली नाही. भारत सरकारने ती जमीन अगोदर घ्यावी व त्यावर सराव केंद्र निर्माण करावीत. प्रस्तापितांना विस्तापित करण्याचा हा प्रयत्न असून, जाणीवपूर्वक एकाच भागावर हा अन्याय होत आहे.या विरोधात उद्या सकाळी १० वाजता निवासी जिल्हाधिका-यांना भेटणार आहोत. तसेच खा. दिलीप गांधींशी याविषयी बोलणे झाले आहे. तसेच केंद्रीय ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे. आम्ही संघटितपणे संरक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हा विषय मांडणार आहोत.

गुंठाभरही जमीन देणार नाही

मागील वेळी शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल भावात संपादित केल्या. आता ही तोच प्रयत्न सुरू आहे. जमिनी गेल्या तर शेतकरी देशोधडीला लागतील. यामुळे यापुढे एक गुंठा जमीन ही लष्कराला देणार नाही, अशा शद्बांत दादा पाटील शेळके यांनी आपला विरोध स्पष्ट केला. नगर, राहुरी व पारनेर या तीन तालुक्यांतील शेतक-यांच्या जमिनी यात प्रस्तावित आहेत. याला विरोध करण्यासाठी तीनही तालुक्यांतील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आपली वज्रमूठ आवळून एकोप्याचा नारा दिला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवान