शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस हा संसर्गामुळे होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:15 IST

श्रीरामपूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात १८० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, ...

श्रीरामपूर : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यात १८० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, असे असले तरी हा आजार संपर्कातून फैलावत नाही. त्यामुळे नागरिकांनी एकदम घाबरून जाण्याची गरज नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर नगर शहरातील आठ रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. यामध्ये आनंदऋषीजी, नोबेल रुग्णालय, साईदीप रुग्णालय व दोन वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.

त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य रुग्णालयांमध्ये मात्र खासगी तत्त्वावरच रुग्णांना उपचार मिळत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून सिव्हिल रुग्णालयातून रुग्णांना इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून या इंजेक्शनचे मोफत वितरण केले जात आहे. अन्य रुग्णांना रुग्णालयाकडून आलेल्या चिठ्ठीप्रमाणे औषधे दिली जात आहेत. म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा आता कोणताही तुटवडा नाही, पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने औषध पुरवठ्याकरिता नियुक्त केलेले समन्वयक वसीम शेख यांनी ‘लोकमत’ला दिली.

----------

औषधींचा पुरेसा साठा

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा कोणताही तुटवडा नाही. दररोज रुग्णांना १०० ते १५० इंजेक्शन पुरविले जात आहेत, असे वसीम शेख यांनी सांगितले.

------------

प्राथमिक लक्षणे

म्युकरमायकोसिस एवढा घातक व आक्रमक आहे की, आपल्याला सांभाळून घेण्याची संधीही देत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या आजाराचा संसर्ग नाक आणि जबड्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सायनसवर होतो आणि तेथून डोळ्यांकडे पसरतो. गंभीर परिस्थितीमध्ये मेंदूचा देखील समावेश होतो. डोळे, जबडा, नाक हे मेंदूपासून खूप जवळ आहेत.

--------

डॉक्टर काय म्हणतात

म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. एका व्यक्तीपासून तो दुसऱ्याला होण्याचा कोणताही संभव नाही. तो एक संधी शोधणारा आहे. कोविडमुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांवर तो हल्ला करतो.

- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नगर.

---------

वातावरणात बुरशीचे अस्तित्व आधीपासूनच आहे. मात्र, जेव्हा रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, तेव्हा त्याची वाढ होते. काळी बुरशी ही जास्त आक्रमक आहे. एस्परजिल्लस, कॅन्डीडीयासिस यांसारख्या इतर बुरशी कमी घातक आहेत.

-डॉ. प्रणयकुमार ठाकूर, सर्जन, श्रीरामपूर.