पिकांच्या नुकसानीचे मोजमाप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:51+5:302021-09-07T04:25:51+5:30

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व राजापूर कृषी मंडलातील शेतातील पिकांचे खरीप हंगामात पावसाचा खंड पडून प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या ...

Measurement of crop damage continues | पिकांच्या नुकसानीचे मोजमाप सुरू

पिकांच्या नुकसानीचे मोजमाप सुरू

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व राजापूर कृषी मंडलातील शेतातील पिकांचे खरीप हंगामात पावसाचा खंड पडून प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या नुकसानीचे मोजमाप कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.

तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरणी योग्य पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांनी बाजरी, तूर व इतर पिकांची पेरणी केली, तसेच कांदा लागवडही केली. त्यानंतर, पावसात सातत्य न राहिले नाही. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पन्न घटणार आहे. तालुका कृषी विभागाकडून देवदैठण मंडळाचे कृषी सहायक प्रतीक कांबळे हे देवदैठण, येवती, ढवळगाव, रायगव्हाण, पिंप्री कोलंदर, मेंगलवाडी, तसेच राजापूर मंडळाचे कृषी सहायक अशोक नेर्लेकर हे राजापूर, हिंगणी, गव्हाणेवाडी, माठ, म्हसे येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन बाजरी, तूर, कांदा या पिकांची पिकांची पाहणी करून मोजमाप करत आहेत.

पिकाची उंची, त्याच्या फांद्या, फुलोरा, बाजरीची कणसे, त्यांचा फुटवा, कांदा पातीची वाढ या बाबींची पिकांच्या कालावधीनुसार वाढ झाली की नाही, याची पाहणी करताना मोजमाप करत आहेत.

शेतकऱ्यांनी या पिकांचा खरीप पिकविमा उतरविला असेल, तर पावसाचा खंड या ट्रीगरअंतर्गत शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

050921\1820img-20210825-wa0022.jpg

पावसाचा खंड पडल्याने पिकांच्या स्थितीचे मोपमाप करताना कृषी सहायक व शेतकरी .

Web Title: Measurement of crop damage continues