शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

शेवगाव तालुक्यात नुकसान लाखोंचे, निधी मिळणार हजारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

शेवगाव : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेती पीक वाहून गेले, जनावरे दगावली, ...

शेवगाव : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेती पीक वाहून गेले, जनावरे दगावली, घरांची पडझड झाली. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावात दाखविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्येकी लाखाेंचे नुकसान अन् मदत हजारात अशी, परिस्थिती निर्माण झाली आहे. तुटपुंजा निधी संदर्भात शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तालुक्यातील विविध गावांत ३० ऑगस्टला रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यात सोयाबीन, भुईमूग पावसाने मातीमोल केले. तर, शेतातील पशुधन, अवजारांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यात सर्वाधिक पेरा कपाशीचा असून सोयाबीन, भुईमूग काढणीला आले होते. दरम्यान, तालुका प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मदतीने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. परंतु ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची आकडेवारी शासनदरबारी पाठविण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर, मूग आदी पिकांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत किती मिळेल?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

_________

तालुक्यातील डोंगर आखेगाव, आखेगाव तितर्फा, खरडगाव, वरुर बु, वरुर खु, भगूर, वडुले बु, जोहरापूर आदी गावांसह शेवगाव शहरातील बाधित वस्त्यांचे पंचनामे करुन तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र २ हजार १९४ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १ हजार ४०२ हेक्टर व्यापारी पीक क्षेत्र असून तृणधान्य ११८, कडधान्य ५३६, तेलबिया ३१, इतर १०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकासाठी ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर प्रमाणे १ कोटी ४९ लाख २३ हजार रुपयांचा निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

---------

बागायती क्षेत्रासाठी १८ हजारांचा प्रस्ताव

बागायत पिकाखालील ६३७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून भाजीपाला व इतर पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० प्रमाणे ८६ लाख रुपये निधी अपेक्षित आहे. तर, ३५.६८ हेक्टर फळबागांचे नुकसान झाले असून हेक्टरी १८ हजार प्रमाणे ६ लाख ४३ हजार निधी अपेक्षित आहे.

---------------

• पिकांव्यतिरिक्त नुकसान खालील प्रमाणे.

• मनुष्य हानीसाठी ४ लाख.

• मृत पशुधन ७७ लाख ९९ हजार

• कुक्कुटपालन पक्षी ६८ हजार ५००

• घरगुती वस्तू सानुग्रह सहाय्य ४५ लाख ६५ हजार

• पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांच्या पडझडीसाठी ३१ लाख ३८ हजार ३००

• घराचे किमान नुकसान ६ लाख ६० हजार