शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरचे सफरचंद बहरले कोपरगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव (जि. अहमदनगर) : सफरचंद म्हणताच आपल्यासमोर काश्मीरसह बर्फाळ प्रदेशांचे नाव समोर येते. सफरचंदासाठी पोषक हवामान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव (जि. अहमदनगर) : सफरचंद म्हणताच आपल्यासमोर काश्मीरसह बर्फाळ प्रदेशांचे नाव समोर येते. सफरचंदासाठी पोषक हवामान आपल्याकडे नाही. मात्र, तरीही कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील ५९ वर्षीय ध्येयवेड्या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात सफरचंदाची बाग फुलवून दाखविली आहे. त्यांच्या झाडांना काही प्रमाणात फळेदेखील लगडली आहेत.

सुहास वाबळे हे कृषी उच्च पदवीधर आहेत. त्यांची सुरेगाव शिवारात साडेबारा एकर शेती आहे. या शेतीत ते नवनवीन प्रयोग करीत असतात. मे - २०१९ मध्ये शेतीविषयक परिसंवाद आणि मार्गदर्शनासाठी वाबळे हे राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्यातील एका गावात गेले होते. त्यावेळी त्या गावात सुमारे ४३ ते ४४ डिग्री तापमानात सफरचंदाची बहरलेली बाग दिसली. प्रत्येक झाडाला ३५० ते ४०० फळे लागलेली होती. हरिमन ९९ या उष्ण हवामानात बहरणाऱ्या सफरचंदाच्या प्रजातीचे जनक हिमाचल प्रदेशातील हरिमन शर्मा यांचीही भेट घेतली. हरिमन ९९ या सफरचंदाच्या वाणाची सुमारे ४०० रोपे आणून २० जानेवारी २०२० ला शेतात लागवड केली. सेंद्रिय औषधे, खते यांचा वापर केला. सुमारे दीड वर्षाच्या काळात ही सफरचंदाची झाडे चांगलीच बहरली आहेत.

वाबळे म्हणाले, सफरचंदाचे भारतात हिमाचलमधील सोलन येथे संशोधन केंद्र असून यामध्ये २० जातीच्या सफरचंदाची रोपे असून त्यातील १७ जाती या हाय चिलिंग आहे. हाय चिलिंग म्हणजे झाडावर बर्फ पडल्याशिवाय फुले बहरत नाहीत. तर तीन जाती या उष्ण हवामानात फुले बहरवून फळ देतात. यात हरिमन ९९, डोरसेट आणि गाला या आहेत. त्यापैकी हरिमन ९९ या जातीची रोपे आणून बाग तयार केली. या झाडांचे आयुष्य हे तीस ते चाळीस वर्षांचे असून साधारण आठ ते दहा वर्षात झाडांची उंची बारा ते पंधरा फुटांपर्यंत जाते. ती पूर्ण सेंद्रिय खत वापरल्याने पहिल्या दोन वर्षात सुमारे अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न निघेल, अशी अपेक्षा आहे.

..............

जानेवारीमध्ये धरता येईल बहार...

बर्फाळ प्रदेशात डिसेंबर ते जानेवारीत बर्फवृष्टी होत असते. त्यामुळे झाडांना पानेच नसतात. या झाडांना फेब्रुवारीनंतर पाने येतात व मार्च-एप्रिलमध्ये फुले येतात. त्यानंतर सफरचंद येण्यास सुरुवात होते. याउलट आपल्याकडे येणाऱ्या या झाडांना जानेवारीमध्ये बहार येतो. मे-जूनमध्ये सफरचंद तयार होतात. त्यामुळे तिकडचा माल येण्याअगोदरच आपली फळे विक्री होऊन चांगला फायदा मिळू शकतो.

.........

अशी केली लागवड

एक एकर क्षेत्रात १२ बाय १० फूट अंतरावर रोपांची लागवड केली आहे. झाडांची लागवड करताना जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंचीचे बेड तयार करून त्यावर झाडांची लागवड केली आहे. कारण जमिनीवर जास्त पाणी साचून झाडे दगावण्याची भीती असते.

........

सव्वा लाख आतापर्यंत झाला खर्च

या सफरचंदाच्या बागेवर आतापर्यंत सुमारे सव्व्वा लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामध्ये ४० हजार रुपयांची ४०० रोपे व इतर खर्चात मशागत, व्यवस्थापन व सेंद्रिय औषधे, खते तयार करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतीच्या शोध घेण्यासाठी झाला आहे.

.........

संशोधनानंतर वीस वर्षात या देशी वाणाची रोपे जर्मनीपर्यंत पोहोचली. मात्र, राहुरी विद्यापीठात अद्यापर्यंत या वाणाची रोपे उपलब्ध नाहीत. ही शासनाची शेतकऱ्यांप्रति असलेली मोठी अनास्था आहे. तसेच प्रत्येक विद्यापीठात सेंद्रिय विभाग असणे आवश्यक आहे.

- सुहास वाबळे, प्रयोगशील शेतकरी, सुरेगाव