शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

घोड धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST

श्रीगोंदा : घोड धरणात ३ हजार १४९ एमसीएफटी म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा झाला असून दोन दिवसांत सात टक्क्यांनी वाढ ...

श्रीगोंदा : घोड धरणात ३ हजार १४९ एमसीएफटी म्हणजेच ६५ टक्के पाणीसाठा झाला असून दोन दिवसांत सात टक्क्यांनी वाढ झाली. मात्र विसापूर तलावाचा पाणीसाठा अवघा ८ टक्के म्हणजे ६८ एमसीएफटी इतकाच आहे. दररोज या पाणीसाठ्यात घटच होत आहे. लाभक्षेत्रासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सध्या २३ हजार ८०३ एमसीएफटी म्हणजे ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात २१ हजार ९८१ एमसीएफटी म्हणजेच ७४ टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा ६ टक्के जादा पाणीसाठा आहे. ही लाभक्षेत्रासाठी जमेची बाजू आहे. मात्र कुकडी लाभक्षेत्रातील पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांची अग्निपरीक्षा पाहणारा ठरणार आहे.

येडगाव धरणातून १ हजार ४०० क्युसेकने पाणी कालव्याला सोडण्यात आले. श्रीगोंदा, पारनेरला एक टीएमसी पाणी देऊन हे आवर्तन बंद करण्यात येणार आहे. येडगावमध्ये ७३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरण ६२ टक्के भरले. धरणात ६ हजार २६० एमसीएफटी इतके पाणी आले आहे. डिंभे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. डिंभे धरणातून घोड नदीत ५० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पिंपळगाव जोगे धरणात २ हजार ४५४ एमसीएफटी ६३ टक्के इतके पाणी आले आहे. जामखेडचा खैरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून मिरजगावचा सीना तलाव ८५ टक्के भरला आहे. ही लाभक्षेत्रासाठी समाधानाची बाब आहे.

----

कधी होणार डिंभे-माणिकडोह बोगदा?

कुकडी प्रकल्पातील ८० टक्के पाणीसाठा आहे. तरीही उन्हाळ्यात नगर, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागणार आहे. भविष्याच्या दृष्टीने डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नावर बैठक घेतली. गेल्या १० वर्षांत या प्रश्नी केवळ बैठकाच सुरू आहेत. मात्र यावर ठोस कार्यवाही काहीच झालेली दिसत नाही.

----

विसापूर तलावात पाणी सोडा

विसापूर तलावात अवघा आठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस नसल्याने विसापूर तलावात कुकडीच्या चालू आवर्तनातून ३०० एमसीएफटी पाणी सोडावे. त्यानंतर विसापूरमधून लाभक्षेत्रासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी बेलवंडी येथील मनोज इथापे यांनी केली आहे.