शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटना लढविणार १०० जागा

By admin | Updated: June 8, 2024 21:40 IST

अहमदनगर : आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही नाकर्तेपणा सिध्द केला़

अहमदनगर : सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नाकर्तेपणा सिध्द केला़ येणाऱ्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली़ संपूर्ण राज्यात शेतकरी संघटना १०० उमेदवार देणार असून, मतदारसंघनिहाय समविचारी व सक्षम उमेदवार मिळाले तर २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले़ नगर येथे झालेल्या बैठकीत रघुनाथदादा पाटील यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली़ बुधवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ तर बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कालिदास आपेट हे संघटनेकडून उमेदवारी करणार आहेत़ गेल्या पंधरा वर्षांत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय घेतले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरूच आहेत़ केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, त्यांनीही शेतकऱ्यांची निराशा केली़ शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारने इजिप्त व पाकिस्तान येथून कांद्याची आयात केली़ कांद्यासह बटाट्यावरही निर्यातबंदी घातली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ मागील निवडणुकीत स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीजबिल माफीची घोषणा केली होती़ स्व़ बाळासाहेबांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असून, त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हवा आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली़ राज्यात ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ भ्रष्ट सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कंटाळलेल्या जनतेला तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे पाटील म्हणाले़