शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी जपताहेत गावरान आंब्यांचे वाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST

अकोले : ग्रामीण भागात पूर्वी चवीनुसार गावरान आंब्याची नावे मदग्या, गुळच्या, खोबऱ्या, आमट्या, चपट्या, गोधड्या, आषाढ्या, पोपटनाक्या अशी मजेशीर ...

अकोले : ग्रामीण भागात पूर्वी चवीनुसार गावरान आंब्याची नावे मदग्या, गुळच्या, खोबऱ्या, आमट्या, चपट्या, गोधड्या, आषाढ्या, पोपटनाक्या अशी मजेशीर होती. आता हे गावरान वाण संपुष्टात आले असून त्यांची जागा हापूस, केशर, पायरीने घेतली आहे. काल परत्वे दुर्मिळ होत चालले गावरान-रायवळ आंबे वाण जतन करण्यासाठीच्या जनजागृतीचा वसा पर्यावरणवादी शेतकरी रमाकांत डेरे यांनी घेतला आहे.

प्रवरा नदी काठावरील चितळवेढे येथील व आदिवासी भागातील धामणवन येथील शेतजमिनीच्या बांधांवर ४० प्रकारचे आंब्याची वृक्ष लावून रायवळ वाण जतन केले आहे. तसेच हापूस, केशर, रत्ना, पायरी, लंगडा, राजापुरी, तोतापुरी, आम्रपाली, सिंधू असे विविध कलमी आंब्याची वृक्ष देखील त्यांच्या संग्रही आहेत. गर्दणी, रेडे, आगार, इंदोरी, रूंभोडी, मेहेंदुरी परिसरात मोठ्या आमराया पूर्वी होत्या, बागायती क्षेत्र वाढल्याने आमराया नामशेष झाल्या. गावठी आंब्याची गोडी टिकून राहावी म्हणून काही शेतकरी प्रयत्नात आहेत. त्यातील एक नाव डेरे हे आहे. निसर्गामध्ये आंब्याच्या नानाविधी जाती दडलेल्या आहेत. या जातींचे संवर्धन व्हावे व त्यांचे जतन करून पुढच्या पिढीसाठी त्यांचा उपयोग व्हावा या हेतूने ते गेली चाळीसहून अधिक वर्षे झटत आहेत. त्यांनी आपल्या शेतावर तसेच शाळा, महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, ग्रामपंचायत यांच्या माध्यमाने निसर्गातील अमूल्य अशा आंब्याच्या वाणांचा संग्रह करून जतन करणे यावर भर दिला आहे. आंब्याचे वानांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ते प्रत्येक वर्षी तालुक्यातील विविध शाळा, संस्था, महाविद्यालय, ग्रामपंचायत, शेतकरी समूह, आदिवासी महिला शेतकरी समूह इत्यादी ठिकाणी भेटी देऊन तांत्रिक प्रशिक्षण देत मार्गदर्शन करतात. आंब्याच्या झाडाचे महत्त्व पटवून देतात व स्वतःच्या घराजवळ आंब्याच्या कोया उगवून ही रोपे लागवडीसाठी देत असतात. त्यांनी विकसित केलेल्या जल आणि मृदसंधारण पद्धतीने पावसाच्या पाण्यावर आंब्याची झाडे उगवली व वाढवली जातात. त्यांच्या अनुभवानुसार गेल्या चाळीस वर्षात हजारो आंब्याची झाडे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर व शाळा परिसरात तयार केलेले आहेत. बांंधांवर पुन्हा आमराया बहरू लागल्या आहेत.

..............

पर्यावरणवादी शेतकरी रमाकांत डेरे यांनी जतन केलेल्या गावठी रायवळ आंब्यांच्या प्रजाती पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाच्या आहे. मातृवृक्ष म्हणून त्यांचे जतन होणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. रायवळ आंब्याचा स्वामित्व अधिकार शेतकरी मिळवू शकतात.

- जितीन साठे, गावरान बियाणे संवर्धन तज्ज्ञ

........फोटो आहे --डेरे