शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करा

By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST

श्रीगोंदा : बाबा, दादा आणि आबा यांच्यामुळे राज्याची कृषी, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली आहे.

श्रीगोंदा : बाबा, दादा आणि आबा यांच्यामुळे राज्याची कृषी, रोजगार, औद्योगिक क्षेत्रात मोठी पीछेहाट झाली आहे. दोन्ही काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राज्याची भाग्यरेषा बदलणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेलवंडी येथे भाजपाच्या प्रचार सभेत बोलताना दिला.सभेच्या अध्यक्षस्थानी खा.दिलीप गांधी होते. गडकरी पुढे म्हणाले की, शेतीमालाला भाव मिळत नाही. खते महाग झाली आहेत. गरिबी आणि श्रीमंती यांच्यातील दरी वाढत आहे. राजकारणात घराणेशाही वाढली. मूठभर नेत्यांची गरिबी हटली मात्र गरिबाची हटली का? हे विदारक चित्र आहे.मोदींमुळे देशात काँग्रेसची दुकानदारी बंद झाली आहे. देशाचे नाव जगात मोठे होऊ लागले आहे. येत्या तीन महिन्यात देशात शेतकऱ्यांच्या इथेनॉलवर बस धावणार आहे. इंधन, गॅस, पेट्रोल निर्मितीतून शेतकऱ्यांना ऊर्जा मिळण्यासाठी धोरण राबविले जाणार आहे. आम्ही जातीयवादी विचारावर राजकारण करीत नाही. माणसाच्या जातीपेक्षा गुणाला महत्त्व देतो. आमचा विरोध आतंकवादी प्रवृत्तीला आहे. आघाडीचे राज्य घोटाळ्यांनी गाजले. राज्याची सत्ता भाजपाकडे द्या, पंचवीस वर्षात झाला नाही एवढा विकास पाच वर्षात करण्याचा आत्मविश्वास देतो.बारामतीपेक्षा सिंचनात श्रीगोंद्याने आघाडी घेतले हे अजित पवारांना खुपले. त्यांनी साकळाईची फाईल माझ्या अंगावर फेकून दिली. आता शरद पवारांनी माझ्या विरोधातील नेत्यांना पदे देऊन मला पाडण्यासाठी रसद पुरविली आहे. माझ्यामुळे राष्ट्रवादीला भगदाड पडले आहे. मी भाजपात मोठा माणूस झालो आहे, असे उमेदवार बबनराव पाचपुते म्हणाले. यावेळी सदाशिव पाचपुते, दीपक भोसले, अर्जुन बोरूडे, अरुण हिरडे, ज्ञानदेव हिरवे, संजय लगड, बाळासाहेब महाडीक, उमेश कासार, बाळासाहेब नलगे, बाळासाहेब काटे यांची भाषणे झाली. (तालुका प्रतिनिधी)