शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
4
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
5
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
6
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
7
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
8
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
9
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
10
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
11
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
12
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
13
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
14
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
15
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
16
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
17
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
18
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
19
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
20
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी-लासलगाव रस्त्याचा वनवास संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

राज्यमार्गाच्या बिकट अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असून दुरुस्तीची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली ...

राज्यमार्गाच्या बिकट अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असून दुरुस्तीची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. रस्त्यावर अगणित खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना तसेच गुजरातकडून येणाऱ्या साईभक्तांना मोठी कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. जड वाहनांची नेहमीच ये - जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. मात्र, निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्याने रस्ते सतत उखडतात आणि खड्डे तयार होतात. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.

बांधकाम विभागाने याकडे कायमच दुर्लक्ष केले. त्यामुळे या मार्गावरील गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली आहे. दहा दिवसांत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच नीळकंठ चांदगुडे यांनी दिला आहे.