शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याचे ढीग : पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 10, 2024 11:39 IST

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून

अहमदनगर: नागापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मंदीचे सावट असतानाच पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ रडतखडत सुरू असलेल्या उद्योगांना विविध समस्यांनी घेरले असून, वारंवार मागणी करून देखील प्रशासनाला पाझर फुटत नाही़ त्यामुळे उद्योजक हतबल झाले आहेत़ नगरचे अर्थकारण उद्योगावर अवलंबून आहे़ बड्या उद्योगांवर ५०० छोटे उद्योग तग धरून आहेत़ काही मोठे उद्योगांचे बॉयलर थंडावले आहेत़ रोजगाराच्या संधीही जेमतेम आहेत़ उद्योगाला मरगळ आली आहे़ आधीच उद्योगासाठी पोषक वातावरण नाही़ त्यात पायाभूत सुविधांचाही अभाव आहे़ उद्योगांनाही विविध समस्यांनी घेरले आहे़ कंपनीत निर्माण होणारा कचरा रस्त्यावर पेटविला जातो़ कंपनीतील थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या,कागद, पॅकिंगचे साहित्य यासारख्या कचर्‍याचा ढीग रस्त्याच्या बाजूला साचला आहे़ किमान कंपनीतील टाकाऊ वस्तुंचे संकलन करणे,कचर्‍याची विल्हेवाट लावणे, ही कामं करावीत,अशी उद्योजकांची अपेक्षा आहे़ मात्र कचर्‍याचे संकलन करणारी यंत्रणा उपलब्ध नाही़ कचरा संकलनाचे काम होत नाही़ उद्योजकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर वसूल केला जातो़ परंतु त्याबदल्यात सुविधा पुरविल्या जात नाहीत़ पायाभूत सुविधासाठी उद्योजकांचा लढा अजूनही सुरूच असून,प्रशासनाला मात्र पाझर फुटत नाही़ उद्योजकांनी याविषयी निवेदने दिली़परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही़ त्यामुळे या समस्यात वाढच होत आहे़ लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष असून, लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्योजकांना लोकप्रतिनिधींकडून अनेक आश्वासने देण्यात आली आहेत़ पण त्यावर कोणतीच कार्यवाही न झाली नाही़ त्यामुळे उद्योगाला कुणीच वाली नाही, अशी भावना उद्योजकांची झाली आहे़ (प्रतिनिधी) पथदिव्यांअभावी एमआयडीसीत अंधाराचे साम्राज्य बहुतांश कंपन्या चोवीस तास सुरू असतात़ रात्रीच्यावेळी कंपन्यांतील कामगारांची ये-जा सुरू असते़ रस्त्यांवर पथदिवे बसविण्यात आले आहेत़ परंतु पथदिव्यांची दुरवस्था झाली असून,ते बंद असतात़ त्यामुळे औद्योगिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असते़ याकडे प्रशासनाचे वेळोवळी उद्योजकांनी लक्ष वेधले़ परंतु याकडे प्रशासनाने जाणीपूर्वक दुर्लक्ष केले असून, प्रकाश व्यवस्था नसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे़ कचरा रस्त्यावर कंपनीत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो़ टाकाऊ वस्तू रस्त्यावर सर्रास टाकल्या जातात़ बहुतांश कंपन्यांच्या प्रवेशद्वाराबाहेर कचर्‍यांचे ढीग पाहायला मिळताता. थरमाकॉल,प्लॅस्टीक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. हा कचरा जागेवरच कुजून दुर्गंधी सुटली आहे. कचरा उचलण्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने कचर्‍यांचे ढीग वाढतच आहेत. त्यामुळे एमआयडीसीची बकाल अवस्था झाली आहे. या दुर्गंधीने कामगारांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचर्‍याचे संकलन करण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.