शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा दिली पण़़़?

By admin | Updated: January 16, 2016 23:10 IST

अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची परीक्षा शनिवारी डी़एड़धारकांनी मोठ्या उत्साहात दिली़ मात्र, बीडमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याची वार्ता समजताच परीक्षार्थींचा उत्साह मावळला़

अहमदनगर : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची परीक्षा शनिवारी डी़एड़धारकांनी मोठ्या उत्साहात दिली़ मात्र, बीडमध्ये ‘टीईटी’चा पेपर फुटल्याची वार्ता समजताच परीक्षार्थींचा उत्साह मावळला़ बीडला पेपट फुटला मग आपले काय, असा प्रश्न हे परीक्षार्थी एकमेकांना करीत होते़ सायंकाळी उशीरा टीईटी परीक्षाच रद्द झाल्याची बातमी धडक्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली़ रात्री उशीरापर्यंत ‘लोकमत’ कार्यालयात परीक्षेबाबत दूरध्वनीवरुन विचारणा होत होती़नगर शहरात ६२ केंद्रांवर दोन सत्रात परीक्षा झाली. यात दोन्ही पेपरला मिळून २० हजार ३६६ पैकी १ हजार ७४८ परीक्षार्थींनी दांडी मारली. परीक्षा संपल्यानंतर जिल्हा परिषद मुख्यालयाच्या इमारतीत पेपर सील करून ठेवण्यात आले असून रात्री पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली. शनिवारी शहरातील ६२ शाळा, हायस्कूल येथे टीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळच्या सत्रात पहिला पेपर झाला. या परीक्षेसाठी २९ केंद्र होते. या पेपरसाठी १० हजार ८६८ परीक्षार्थींनी अर्ज केला होता. त्यातून परीक्षेसाठी ९ हजार ९१८ उमेदवार हजर होते. ९५० परीक्षार्थींनी पहिल्या पेपरला दांडी मारली. दुपारच्या टप्प्यात दुसरा पेपर झाला. या पेपरसाठी ९ हजार ४९८ परीक्षार्थी यांनी अर्ज केला होता. त्यापैकी ८ हजार ७०० जणांनी पेपर दिला. या पेपरला ७९८ जणांनी दांडी मारली. परीक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाचे उपसंचालक दिनकर टेमकर यांच्या पथकाने विविध केंद्रांना भेटी देत पाहणी केली. परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात टीईटीचा पेपर फुटला असल्याची चर्चा नगरमध्ये धडकली. यामुळे शिक्षण विभाग काळजी घेताना दिसत होते. परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, गुलाब सय्यद, विस्तार अधिकारी रमजान पठाण, शिवाजी कराड, एस. एम. वाव्हळ, अभयकुमार वाव्हळ यांनी परिश्रम घेतले. शनिवारी सायंकाळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पेपर फुटीमुळे टीईटी परीक्षा रद्द करण्याची घोषणा करीत दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली़ यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले़(प्रतिनिधी)