शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मगर यांचा निर्णय विनाशकाले विपरीत बुद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST

नागवडे म्हणाले की, केशव मगर यांना शिवाजीराव नागवडेंनी राजकारणात आणले. सत्तेची दोरी हाती दिली. परंतु, मगर यांचे मित्रांनी कान ...

नागवडे म्हणाले की, केशव मगर यांना शिवाजीराव नागवडेंनी राजकारणात आणले. सत्तेची दोरी हाती दिली. परंतु, मगर यांचे मित्रांनी कान फुंकले आणि त्यांच्या अंगात वारे शिरले आहे.

सहवीजनिर्मिती प्रकल्पाबाबत मगर यांनी आरोप केले की, कारखान्याची ८० लाखांची अनामत रक्कम जप्त होणार. पर्यावरण विभागाची मान्यता नसल्याने ७० लाखांचा दंड होणार, पण या विरोधात आमची कायदेशीर लढाई सुरू असून ही रक्कम वाचविणार आहोत. दिशाभूल करणारी माहिती त्यांनी सांगितली, पण वीजनिर्मिती प्रकल्प उभा करताना ३५ कोटी वाचविले, हे ते का सांगत नाहीत. कारखान्याचे सर्व निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत होतात. खरेदी-विक्रीचे निर्णय तर मगर यांना विचारुन झाले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप खोटा आहे.

शासनाने शिक्षक भरतीस बंदी घातली आहे. त्यामुळे कोणती भरती झाली? राज्यातील पाॅलिटेक्निकची वाईट अवस्था आहे. यामध्ये इंदिरा गांधी पाॅलिटेक्निकची परिस्थिती चांगली आहे.

सर्व संचालक मंडळ सोबत आहेत, पण मगर हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बाहेर पडले आहेत, हे सर्वांना ज्ञात आहे. जनता अशा विश्वासघातकी विचारांना थारा देणार नाही. आण्णासाहेब शेलार व दीपक भोसले यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता यांच्याविषयी बोलण्याची गरज नाही. ते उद्या बरोबर असतील, असेही नागवडे म्हणाले.

------

फोटो - राजेंद्र नागवडे