शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे ५० लाख लीटर पाणी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: महापालिकेच्या वसंत टेकडी येथे नव्याने बांधलेला जलकुंभ शुक्रवारी रिकामा करण्यात आला. जलकुंभातील पाणी नगर- मनमाड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: महापालिकेच्या वसंत टेकडी येथे नव्याने बांधलेला जलकुंभ शुक्रवारी रिकामा करण्यात आला. जलकुंभातील पाणी नगर- मनमाड महामार्गावर सोडून देण्यात आले होते. त्यामुळे महामार्गाला नाल्याचे स्वरुप आले होते.

महापालिकेच्या अमृत योजनेंतर्गत वसंत टेकडी येथे ५० लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. या टाकीची चाचणी करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी हा जलकुंभ पाण्याने भरला होता. तो शुक्रवारी रिकामा करण्यात आला. हे पाणी नगर- औरंगाबाद महामार्गावर सोडण्यात आले. महामार्गाच्या दोन्ही बाजूने दिवसभर पाणी वाहत होते. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्याने पाण्याचे फवारे उडत होते. याबाबत वसंत टेकडी येथे काम करत असलेल्या ठेकेदाराच्या कामगारांकडे विचारणा केली असता जलकुंभाची चाचणी करण्यासाठी पाणी भरले होते.ते सोडून देण्यात आले आहे. शनिवारी इनलेट आणि आऊट जोडण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. जलकुंभातील पाणी रस्त्यावर सोडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याच्या एका बाजूने वाहतूकही ठप्प झाली होती.

...............

- जलकुंभाची चाचणी घेण्यासाठी पाणी भरले होते. हे पाणी शुक्रवारी सोडून दिले. शनिवारी जलकुंभाला आऊटलेट व इनलेट जोडणार असून, त्याची तयारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

- रोहिदास सातपुते, पाणीपुरवठा विभाग प्रमुख

...

सूचना फोटो आहे.