शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ लाख लोकांना होऊन गेला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

अहमदनगर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषेदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ४३३ लोकांचे ...

अहमदनगर : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषेदेने (आयसीएमआर) आतापर्यंत तीन वेळा सर्वेक्षण केले आहे. तिसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील ४३३ लोकांचे रक्तनुमने तपासले. त्यामध्ये ९८ जणांमध्ये कोरोनाच्या ॲन्टीबॉडीज तयार होत असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजे हे प्रमाण २२.०६ टक्के इतके आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाशी तुलना केली असता तब्बल नऊ लाख लोकांना कोरोना होऊन गेला हे समजलेच नाही, असे स्पष्ट होत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‘आयसीएमआर’च्या वतीने सीरो सर्वेक्षण करण्यासाठी राज्यातील बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगाव हे सहा जिल्हे निवडले होते. २१ ते ३० मे दरम्यान पहिला टप्पा, २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर रोजी दुसरा टप्पा, २३ ते २९ डिसेंबरदरम्यान तिसरा टप्पा झाला. या सर्वेक्षणात नागरिकांमध्ये कोरोनाशी लढणाऱ्या ॲन्टीबॉडीज तयार होत आहेत का, याचे संशोधन करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात ४३३ लोकांचे रक्तनमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे प्रमाण २२.०६ टक्के आहे. या प्रमाणाशी एकूण लोकसंख्येशी तुलना केली असता तब्बल ९ लाख ९२ हजार ७०० लोकांमध्ये या ॲन्टीबॉडीज तयार होत असल्याचे दिसते आहे. म्हणजे एवढ्या लोकांना कोरोना होऊन गेला, हे समजलेच नाही, असेच या अहवालाचा अर्थ असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही सेरो सर्वे करण्यात आला. नगर जिल्ह्यात १०३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये २१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे प्रमाण २०.०४ टक्के आहे. कोरोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

--------

सेरो सर्वे अहवाल

कोणाची चाचणी पॉझिटिव्ह प्रमाण

सामान्य नागरिक ४३३ ९८ २२.०६

हेल्थ केअर १०३ २१ २०.०४

-----------------

सेरो सर्वेक्षण कशासाठी ?

उच्च जोखीम असलेले आरोग्य सेवा कर्मचारी, कामगार, इम्युनो कॉप्रोप्राईज्ड व्यक्ती, कटेन्मेंट झोनमधील व्यक्ती संक्रमित झाल्या होत्या काय? हे सर्वेक्षणातून स्पष्ट होते. तसेच रँडम पद्धतीने नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करून त्यांच्यामध्ये ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत काय? सामूहिक प्रतिकारशक्तीची माहिती होऊन उपाययोजनांची दिशा ठरविण्यासाठी प्रतिकार शक्तीचे अनुमान बांधले जाते व संसर्ग प्रमाणाचा अंदाज कळतो.

---

नगर जिल्ह्यात तीन टप्प्यांत सेरो सर्वे झाला. लोकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते की नाही, हे तपासण्यासाठी हा सर्वे होता. जिल्ह्यात २२ टक्के लोकांमध्ये इम्युनिटी वाढली आहे. याचाच दुसरा अर्थ त्यांना कोरोना होऊन गेला, असेही म्हणता येईल. हा सर्वे रँडम असतो. त्यामुळे त्याचा नक्की काय निष्कर्ष असेल, हे सांगणे कठीण आहे.

- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्यचिकित्सक

---

जिल्ह्यात कुठे झाला होता सर्वे

केळूंगण, कासार दुमाला, नांदुर्खी खुर्द, मडकी, शेवगाव, कौडगाव, वासुंदे, मधेवडगाव, संगमनेर, अहमदनगर, राशिन, बारडगाव सुद्रिक, मिरजगाव, कुलधरण.

---------

फाईल फोटो- कोरोना