शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दोन वर्षांपासून यात्रा लॉकडाऊनच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:21 IST

सुपा : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सुपा (ता. पारनेर) परिसरातील यात्रा लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे पाहुण्यांची सरबराईही थांबली असून, ...

सुपा : कोरोनामुळे दोन वर्षांपासून सुपा (ता. पारनेर) परिसरातील यात्रा लॉकडाऊनच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. त्यामुळे पाहुण्यांची सरबराईही थांबली असून, गावकारभाऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

पारनेर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून वाळवणे येथील भैरवनाथांची यात्रा प्रसिद्ध आहे. नगर व पुणे जिल्ह्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागातील भाविकांच्या उपस्थितीने व्यापक स्वरूपात हा यात्रोत्सव, कुस्त्यांचे फड येथे रंगतात. त्याबरोबर जवळच असणाऱ्या जातेगाव, आपधूप, पिंप्री गवळी, रायतळे, अस्तगाव या गावातही त्यांच्या ग्रामदैवतांचा यात्रोत्सव असला तरी कोरोनामुळे या यात्रा जत्रा गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी लॉकडाऊनच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. साहजिकच या उत्सवाचे आयोजन नियोजन व कार्यवाही करणाऱ्या गावकरभाऱ्यांच्या उत्साहावर त्यामुळे पाणी फिरले आहे. कोरोनाच्या पुनरागमनाने व त्यातील दुर्घटना, इंजेक्शन मिळत नाही. कुठे बेड नाही तर काही ठिकाणी ऑक्सिजन नसल्याने रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या जीवघेण्या धावपळीच्या बातम्यांनी जीव कासावीस होत असल्याने ‘नको रे बाबा’ ही महामारी त्यासाठी यात्रा बंदी केलेली बरी असे गावच्या कारभारी मंडळीमधून बोलले जातेय, असे भैरवनाथ देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सचिन पठारे यांनी सांगितले.

सुपा परिसरातील यात्रांचे वैशिष्ट्य म्हणजे जवळच्या नातेवाईकांना, घरातील सर्व सदस्यांना यात्रेसाठी खासकरून गावी बोलावून घेतले जाते. सर्वांच्या उपस्थितीने एक चांगला सुसंवाद त्यानिमित्ताने घडतो. वैचारिक देवाणघेवाण होते. यामुळे नात्यातील वीण घट्ट व मजबूत होत असल्याचे सुरेश थोरात यांनी सांगितले. गावातील जत्रेसाठी तेथील लोक आवर्जून पाहुण्यारावळ्यांना आमंत्रण देऊन बोलावून घेतात. येत्या आठवड्यातच दोन दिवसानंतर एकामागोमाग एक या यात्रा असून चैत्र महिन्यातच गेल्या वर्षी व याही वर्षी लॉकडाऊन असल्याने दोन वर्षांपासून यात्रा, त्यानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका, शोभेचे दारूकाम, मिठाईची दुकाने, खेळणी, घरगुती व शेतीकामाच्या छोट्या-मोठ्या वस्तूची खरेदी-विक्री बंद झाली व पर्यायाने छोटे-मोठे व्यावसायिक यांना त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि.२७) जातेगाव येथील भैरवनाथ तर त्याच दिवशी आपधूप येथेही यात्रा असते. वाळवणे येथील भैरवनाथांची जत्रा या वर्षी बुधवारी (दि.२८) आहे. परंतु, लॉकडाऊन, संचारबंदी आदेश यामुळे ही यात्रा व कुस्त्यांचा फड असे दोन्ही कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती विश्वस्त समिती अध्यक्ष सचिन पठारे यांनी दिली. दोन वर्षांपासून कोरोनाची भीषण छाया पसरली असल्याचे वाळवणेच्या सरपंच जयश्री पठारे यांनी सांगितले.