शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चंबळच्या खोऱ्यात साकारला ‘चौर्य’

By admin | Updated: July 21, 2016 23:56 IST

अहमदनगर : देवाची श्रद्धा आणि चोरी यांचा शोध घेणारी शनिशिंगणापूरवरील स्टोरी आता ‘चौर्य’ या चित्रपटातून पडद्यावर साकारणार आहे.

अहमदनगर : देवाची श्रद्धा आणि चोरी यांचा शोध घेणारी शनिशिंगणापूरवरील स्टोरी आता ‘चौर्य’ या चित्रपटातून पडद्यावर साकारणार आहे. रोमांचकारी ‘चौर्य’चे चित्रीकरण राजस्थानमधील चंबळच्या खोऱ्यात झाले आहे. दरवाजा नसलेल्या घरांची स्टोरी या चित्रपटातून उलगडणार आहे. ५ आॅगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकारांनी गुरुवारी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देवून चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडला.शाळा, फँड्री, सिद्धांत अशा सरस चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईचे नीलेश नवलखा, विवेक कजारिया, अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजन आमले हे सहनिर्माते आहेत. समीर आशा पाटील हे नव्या दमाचे लेखक-दिग्दर्शक या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत. किशोर कदम, गणेश यादव, मिलिंद शिंदे, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास,दिनेश लता शेट्टी, तीर्था मुरबाडकर आणि श्रुती कुलकर्णी आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक समीर पाटील म्हणाले, जागृत देवस्थान असल्याने शिंगणापूर गावात चोरी होत नाही. चोरी करणाऱ्यांना देव शिक्षा करतो,अशी गावातल्या रहिवाशांची धारणा असते. त्यामुळे गावातल्या घरांना दरवाजे नसतात. परंतु एकाएकी या देवळातच चोरी होते आणि लोकांच्या श्रद्धेला तडा जातो. अंगावर शहारे आणणाऱ्या या ‘सस्पेन्स थ्रिलर’ची अनोखी सांगड असल्यामुळे चित्रपटात पुढे नक्की काय घडतं यासाठी चित्रपट पहावा लागणार आहे. ह्यउत्तम कथा, लोकेशन्स आणि सस्पेन्स थ्रिलरची सांगड यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मयुरेश केळकर यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केलं आहे. लोककला आणि आताच्या काळाची सांगड घालणारे गाणे प्रा. गणेश चंदनशिवे यांनी गायले आहे. या गाण्याबद्दल केळकर म्हणाले, शंकरराव धामणीकर यांचं १९६० मधील पारंपरिक पद्धतीचं गीत ‘देवा वाचून सुनं, माझं झुरतंय मन’ हे गाणं चित्रपटात वापरले आहे. लोककलेतील गोंधळ जागरणाच्या माध्यमातून हे गाणं चित्रित करण्यात आले असून प्रा. चंदनशिवे यांनीच गाणे सादर केले आहे.अंध-कर्णबधिरांना मिळणार चित्रपटाचा आनंदनिलेश नवालखा म्हणाले, मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘अ‍ॅक्सेसेबिलीटी फॉर्मेट’ चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यामुळे अंध आणि कर्णबधिरांनादेखील या चित्रपटाचा आनंद हा सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे घेता येणार आहे. त्यासाठी खास युरोपियन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पुणे येथील एका स्वतंत्र चित्रपटगृहात रोटरी क्लबच्या सहकार्याने अंध-कर्णबधिरांना चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी सात शो आयोजित केले आहेत. खुर्चीला हेडफोन दिले तर अंधाना चित्रपट बघता येतो, मात्र असे तंत्रज्ञान आपल्या देशात उपलब्ध नाही. त्यामुळे आमचा प्रयोग भारतात पहिल्यांदाच होतो आहे.चित्रपटात नावे नसलेली पात्रंचित्रपटातील कोणत्याही पात्रांना नावे देण्यात आलेली नाहीत. बाई, इसम अशीच नावे पात्रांना दिली आहेत. कोणाच्या चेहऱ्यावर कोणाचा मुखवटा आहे. व्यक्तीरेखांचा चेहरा ओळखण्यात सावळा गोंधळ आहे. पात्र बोलत नाहीत, तर फ्रेम बोलतात. हीच मजा चित्रपटातून दाखविली आहे. राजस्थानातील चंबळ खोऱ्यात पोलीस संरक्षणात चित्रपटाचे शुटिंग करण्यात आले आहे. तेथील किस्सेही पाटील यांनी सांगितले.