शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

सलग भारनियमनाने नगरकरांचा संताप

By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST

अहमदनगर : नवरात्रौत्सव काळात राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, याची अधिकृत घोषणा करूनही तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली चार ते सहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अहमदनगर : नवरात्रौत्सव काळात राज्यात कोठेही भारनियमन होणार नाही, याची अधिकृत घोषणा करूनही तातडीच्या भारनियमनाच्या नावाखाली चार ते सहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नगरकरांत संताप व्यक्त होत आहे. महापौर संग्राम जगताप, तसेच मनसेच्या वतीने मंगळवारी याच्या निषेधार्थ महावितरणला निवेदन देण्यात आले. नवरात्रौत्सव काळात घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांनी विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. भारनियमनामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे. शिवाय ‘आॅक्टोबर हिट’चे चटकेही बसायला सुरूवात झाल्याने उकाड्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अनियमित भारनियमन त्वरित रद्द करावे, अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांच्यासह नगरसेवक विपुल शेटिया, अविनाश घुले, कमलेश भंडारी, मयूर कुलथे यांनी अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांची भेट घेऊन भारनियमनाबाबत नाराजी व्यक्त केली. वीजवाहिन्यांत बिघाड झाल्याचे सांगून शनिवारपासून विविध फिडरवर चार ते सहा तासांचे हे भारनियमन सुरू झाले आहे. याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली, तर वरिष्ठांकडून आदेश असल्याचे साचेबद्ध उत्तर मिळते. मनसेच्या वतीनेही कार्यकारी अभियंता बापूसाहेब गोरे यांची भेट घेऊन शहराध्यक्ष गिरीश जाधव, नितीन भुतारे, रोहन शेलार, मयूर घाडगे, सतीश ओव्हळ आदी कार्यकर्त्यांनी लोकांच्या भावना अधिकाऱ्यांना कळवल्या. यात लवकर सुधारणा न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. (प्रतिनिधी)