शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सरासरी १३ मि़मी़ पाऊस

By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST

अहमदनगर: गेल्या अडीच महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाचे शहरासह जिल्ह्यात आगमन झाले आहे़

अहमदनगर: गेल्या अडीच महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाचे शहरासह जिल्ह्यात आगमन झाले आहे़ दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असून, गुरुवारी सरासरी १३़ ३२ मि़मी़ पावसाची नोंद झाली़ त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो़ मात्र जून व जुलै पूर्णपणे कोरडा गेला़ आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले़ पण तो फारकाळ टिकला नाही़ अनुकूल वातावरण असूनही, पावसाने ओढ दिली़ एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे़ परंतु तो सर्वदूर नाही़ कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे़ जिल्ह्यात गुरुवारी १३़ ३२ मि़ मी़ पाऊस झाला़ दुसऱ्या दिवशीही काही भागात पाऊस पडला़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार संगमनेर तालुक्यात सर्वाधिक सरासरी ४० मि़ मी़ पाऊस झाला़ जामखेड परिसरात यापूर्वी अत्यल्प पाऊस झाला़ या तालुक्यात पाऊस सुरू असून, परिसरात गुरुवारी ३६ मि़ मी़ पाऊस झाला़ पूर्वीचा पाऊस नसल्याने खरिपाची पिके गेली़ नुकत्याच झालेल्या पावसामुळे रब्बीची पिके घेता येतील़ पाथर्डीमध्ये २० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ या तालुक्यात यापूर्वीचा पाऊस नाही़ याठिकाणी हा पहिलाच पाऊस आहे़ तिसगाव, माणिक दौंडी, टाकळी मानूर, जोडमोहोज या भागाातच हा पाऊस झाला़ उर्वरित गावांत पाऊस नाही़ नेवासामधील काही भागात यापूर्वीचा पाऊस झाला़ त्यावर खरिपाची पेरणी झाली़ परंतु बहुतांश गावांत पेरण्या होऊ शकल्या नाहीत़ गेल्या दोन दिवसांपासून येथेही पावसाला सुरुवात झाली आहे़ नगर तालुक्यांत पाऊस नव्हता़ येथे गुरुवारी १८ मि़ मी़ पाऊस झाला असून, रब्बीची पिके घेणे शक्य आहे़शेवगाव शहरासह परिसरात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही़ पावसाअभावी येथे पेरण्या झाल्या नाहीत़ शेवगावमध्ये १ मि़मी़ पावसाची नोंद झाली असून, गुरुवारी याठिकाणी पाऊस झाला नाही़ कोपरगाव तालुकाही कोरडाच आहे़ येथे अवघा १ मि़मी पाऊस पडला़ यापूर्वीदेखील इथे पाऊस पडला नाही़ श्रीगोंदाही यास अपवाद नाही़ दरम्यान श्रीरामपूर तालुक्यात जोरदार पुनरागमन केले. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी परिसरात वादळीवाऱ्यासह गारा पडल्याने फळबागांसह शेतीचे नुकसान झाले.(प्रतिनिधी)