शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर भाजीपाल्याचे दर २५ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, बटाटे, दुधी भोपळा, फ्लाॅवर, कोबी, कोथिंबीर, भुईमुगाची शेंगाची चांगली आवक झाली आहे. ...

नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो, बटाटे, दुधी भोपळा, फ्लाॅवर, कोबी, कोथिंबीर, भुईमुगाची शेंगाची चांगली आवक झाली आहे. त्या तुलनेत गवार, वांगी, घोसाळे, कारले, भेंडी, वाल, मेथी, पालक या भाज्यांची आवक कमी होती. त्यामुळे या भाज्यांचे दर वाढले आहेत. दर वाढले तरी शेतकऱ्यांच्याऐवजी विक्रेत्यांनाच जास्त फायदा झाल्याचे दिसून येत आहे.

---------------

भाजीपाल्याचे ठोक दर (प्रतिकिलो )

भाजी १४ जून २० जून

टोमॅटो १० १०

बटाटे ११ १५

भेंडी २० ३५

मिरची २५ ३०

कारले ३० ३५

फ्लावर ८ ४०

वांगे ५ ४०

पालक ५ १०

-------------

पुन्हा वरणावर जोर

---------

आधी लॉकडाऊन होता म्हणून भाज्या मिळत नव्हत्या. त्यामुळे त्यावेळी जास्त वरणावरच जोर द्यावा लागला. आता अनलॉक आहे. मात्र, भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेले असताना आता भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे जीणे कठीण झाले आहे.

-शैला धावडे, माळीवाडा.

------------

चांगला पाऊस झाला आहे. सगळीकडे हिरवेगार वातावरण आहे. त्यामुळे भाजीपाल्याचीही आवक होईल आणि भाजीपाला स्वस्त होईल, असे वाटत होते. मात्र, सध्या भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सामान्य लोक आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त आहेत. त्यात आता भाजीपालाही महागला आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे.

- मनीषा जोशी, भिस्तबाग नाका, सावेडी.

---------------

म्हणून वाढले दर..

सध्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. आवक कमी झाली की दर वाढतात. त्यात सध्या उन्हाची तीव्रता जास्त आहे. पाऊस नाही. त्यामुळे नव्या भाज्यांची आवक कमी आहे. उन्हाळी भाजीपाला आला संपला आहे. मेथी, दोडके, घोसाळे अशा भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत.

-नरेंद्र देशमुख, भाजीपाला विक्रेते.

-----------

पावसाळी वातावरण सुरू झाले आहे. मालही कमी येत आहे. फुलगळती, फळगळती आणि काही फळभाज्यांना कीडही लागते. त्यामुळे मालाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे कमी आवक आणि दुसरीकडे अनलॉक झाल्यानंतर भाजीपाल्याला मागणी मात्र वाढली आहे.

-अंकुश सर्जेराव काळे, व्यापारी.

----------------

शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा

----

टोमॅटोचे उत्पादन यंदा शेतकऱ्यांनी चांगले घेतले आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र ठोक बाजारात शेतकऱ्यांना कवडीमोल किंमत दिली जाते. त्यामुळे नक्की काय सुरू आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्येच संभ्रम आहे.

-संकेल लाळगे, कृषिमित्र.

------------------

आता डाळिंबाचे चांगले उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांकडून ४० ते ५० रुपये किलोने घेतले जातात. मात्र, किरकोळ बाजारात दोनशे रुपये किलोने विकली जात आहेत. शेतकऱ्यांना कोणताही आर्थिक लाभ होत नाही. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट घ्यायचे. त्यात उत्पादकांचे मरण आहे.

श्रीधर बेल्हेकर, शेतकरी.

---------

डमी -८३१- नेट फोटो