शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

भुके नाही अन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 5:33 AM

खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती.

- प्रा. शिवाजीराव भुकेले

आपला देश तसा धर्मप्रवण आहे. इथे जेवढे धार्मिक सोहळे साजरे होतात, तेवढे जगाच्या पाठीवर कदाचित कोठेच होत नसतील. खरे तर मातृ देवो भव: पितृ देवो भव: अशी शिकवण देणारी आपली संस्कृती. ज्याला माता-पित्यांच्या पायाचे चरणतीर्थ मिळते, त्याला इतर कुठल्याच तीर्थाची गरज नसते. हा आदर्शवाद एका बाजूला आपली बोथट होत चाललेली संवेदना आई-बापांनाच आपला वैरी मानू लागली आहे. हा आत्मघात आहे, जो कुटुंब व्यवस्थेचा कणाच मोडून टाकणारा आहे. अशा माता-पिताद्वेषी माणसांच्याविषयी संत नामदेव म्हणाले होते -जयाचे उदरी जन्माला जों नर । पीडी तया थोर सर्वकाळ ।मानीली अंतरी सखी जीवलग। आत्महत्या मग घात करी ।नामा म्हणे ऐसें पातकी चंडाळ बुडविले कुळ बेचाळीस। ज्यांच्या पोटी जन्म घ्यायचा, त्यांनाच एवढे पिडायचे की, बिचाऱ्या माता-पित्यांना या छळवणुकीपेक्षा मरण बरे वाटावे. अशा कुटुंबद्रोही दिवट्यांना संत नामदेवांनी चंडाळ म्हटले आहे. अशा नराधमास जन्म देण्यापेक्षा वांझोटे राहिलो असतो तर खूप बरे झाले असते अशी पश्चात्तापाची वेळ आज अनेक माता-पित्यांवर येत आहे. त्यामुळे घरे ओस पडत आहेत आणि वृद्धाश्रम ‘हाउसफुल्ल’ होत आहेत. आत्मा-परमात्म्याच्या मिलनाच्या गप्पा मारीत आहेत. आपल्या आई-बाबांना कडकडून भूक लागायची, तेव्हा त्यांना वेळेवर कोरभर भाकरी न देणारी मंडळी भौतिक ऐश्वर्याची सूज आल्यानंतर मोठमोठ्या तीर्थक्षेत्रात जाऊन आई-बाबांच्या नावाने पिंंडदान करीत आहेत. त्यापेक्षा हा ‘पीळदार’ देह दिला, त्यांना जिवंतपणी अन्न, वस्त्र, निवाºयाचे छत्र आणि पुत्राचे वात्सल्य देऊ या ! नाहीतर तुकोबारायांनी म्हटलेच आहे -भुके नाही अन्न । मेल्यावरी पिंंडदान ।हे तो चाळवा चाळवी । केले आपणीच जेवीं ।नैवेद्याचा आळ । वेचे ठाकनी सकळ ।तुका म्हणे जड । मज न राखावे दगड ।

टॅग्स :spiritualअध्यात्मिक