शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात २८ हजार रबीचे क्षेत्र उद्ध्वस्त

By admin | Updated: March 4, 2015 01:48 IST

वादळी पावसाने जिल्ह्यात तीन दिवसात २८ हजार ४२७ हेक्टरील रबी पिकांचे नुकसान झाले.

यवतमाळ : वादळी पावसाने जिल्ह्यात तीन दिवसात २८ हजार ४२७ हेक्टरील रबी पिकांचे नुकसान झाले. या सोबतच कापसालाही मोठा फटका बसला असून सततच्या पावसाने कापसातील सरकी अंकुरण्याच्या अवस्थेत आहे. तर हवामानाच्या बदलाने पणन महासंघाने कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.जिल्ह्यात ८४ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात गहू आणि हरभरा काढणीला आला होता. मात्र निसर्गाच्या अवकृपेच फटका या पिकांना सोबतच संत्रा, केळी, पपई, भाजीपाला पिकांना बसला. तीन दिवस बरसलेल्या पावसाने गहू मातीमोल झाला. सर्वत्र शेतात गहू झोपल्याचे दिसत आहे. ४३३ गावातील पिकांना वादळाचा जबर फटका बसला आहे. दोन दिवसात सरासरी ४८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सर्वाधिक ४५ मिमी पावसाची नोंद यवतमाळात करण्यात आली. अनेक शेतात उशिरा पेरणी झालेला पऱ्हाटी आहे. पऱ्हाटीला मोठ्या प्रमाणात कापूस लागला आहे. मात्र वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने हा कापूस शेतातच होता. त्यालाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. ओल्या झालेल्या कापसाच्या सरकीला अंकुर फुटत आहे. तर दुसरीकडे पणन महासंघाने ढगाळी वातावरण लक्षात घेता कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी मोठा अडणीत सापडला आहे. (शहर वार्ताहर)