शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ससेपालनातून शोधला प्रगतीचा मार्ग

By admin | Updated: October 6, 2016 00:22 IST

यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दोर गळ्याला आवळत आहे.

पूरक व्यवसाय : मुळावा येथील प्रल्हाद देशमुख यांची धडपडमुळावा : यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दोर गळ्याला आवळत आहे. मात्र याच यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील प्रल्हादराव देशमुख यांनी शेतीपूरक व्यवसायातून प्रगतीचा मार्ग शोधला. दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालनाला ससे पालनाची जोड दिली आहे. तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रल्हाद देशमुख यांच्याकडे १२ एकर ओलिताची शेती आहे. शेतीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी शेतातच घर बांधले. मुलगा कृष्णा डीएड झाला असून नोकरीच्या मागे न लागता त्याने शेतीत स्वत:ला झोकून दिले आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून सुरुवातीला चार म्हशी आणल्या. दुधाचा व्यवसाय सुरू झाला. त्यानंतर म्हशीची संख्या वाढविली. दुधातून बऱ्यापैकी पैसा मिळत आहे. अशातच त्यांनी शेळी पालन व्यवसायही सुरू केला. यासोबतच ससे पालन सुरू केले. या ससे पालनातूनही त्यांना चांगले पैसे मिळत आहे. विशेष म्हणजे बँकेचे कोणतेही कर्ज न घेता त्यांनी हा व्यवसाय उभारला आहे. सकाळी ५ वाजतापासून तर रात्री १० वाजेपर्यंत शेतात राबून प्रगतीचा मंत्र इतर शेतकऱ्यांना देत आहे. त्यांचा हा प्रकल्प पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी शेताला भेट देत असतात. (वार्ताहर)