शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळांमध्ये ४० टक्केच विद्यार्थी परतले

By admin | Updated: July 19, 2014 01:48 IST

विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षक व संस्थानिकांची

‘एटीसीं’चा दावा ८० टक्क्यांचा : तीन शाळांना भेट देऊन पाहणीयवतमाळ : विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शिक्षक व संस्थानिकांची धावाधाव सुरू असली तरी आतापर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच विद्यार्थी आदिवासी आश्रमशाळांमध्ये परतले आहे. मात्र संस्थांकडून हा आकडा फुगवून दुपटीने सांगितला जात आहे. दरम्यान अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर वाळींबे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन शाळांना भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांचे वास्तव स्टिंग आॅपरेशनद्वारे ‘लोकमत’ने उघड केले होते. २६ जूनला सर्व शाळा उघडल्या. त्यावरून तीन आठवडे लोटूनही आदिवासी आश्रमशाळा बंद अवस्थेत व विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पुढे आले होते. त्याची दखल घेत पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले यांनी या शाळांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथक गठित केले. या पथकाला चार दिवसात अहवाल मागण्यात आला. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे आश्रमशाळांची यंत्रणा विद्यार्थ्यांना शाळेत परत आणण्यासाठी कामाला लागली आहे. संस्थानिक व शाळेचे शिक्षक, कर्मचारी गावागावात जाऊन विद्यार्थ्यांना शाळेत आणत आहेत. पालकांना विनवण्या करीत आहेत. त्यानंतरही आजच्या घडीला अवघे ३० ते ४० टक्के विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचल्याची माहिती आहे. परंतु आश्रमशाळांचे संचालक हा आकडा फुगवून सांगत आहे. खरोखरच आश्रमशाळेत किती विद्यार्थी हजर आहेत, हे तपासायचे असेल तर सकाळच्या जेवणाच्या वेळी बसणाऱ्या पंगतीत ते सहज तपासणे शक्य होते. ‘लोकमत’ प्रतिनिधीने अशा पंगतींचेही वास्तव टिपले असता ३० ते ४० टक्क्याचा आकडा पुढे आला. दरम्यान, अमरावतीचे आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर बाळींबे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील तीन शाळांना अकस्मात भेट देऊन पाहणी केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांची लासीना येथील अनुदानित आश्रमशाळा तसेच बाभूळगावची शाळा व कापरा येथील शासकीय आश्रमशाळेत भेट देण्यात आली. या शाळांमध्ये ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचा दावा वाळींबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती, दहावी-बारावीचे निकाल, इमारत बांधकाम, प्रसाधनगृह व अन्य व्यवस्था पाहता आपण समाधानी असल्याचे बाळींबे यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू झाल्यानंतर किमान एक महिना तरी आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळांमध्ये पूर्ण संख्येने परतत नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यावेळी त्या तुलनेत विद्यार्थी लवकर शाळेत पोहोचल्याचे वाळींबे म्हणाले. विद्यार्थी उपस्थित नसतील त्या महिन्यातील अनुदानाची रक्कम आश्रमशाळांना दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)