शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात तीन आंदोलने

By admin | Updated: October 3, 2015 02:26 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी : १५० व्या गांधी जयंती दिनी डॉक्टर, शिक्षक, संघटनेचे धरणेयवतमाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. शुक्रवारी त्यांची १५० वी जयंती देशभरात साजरी झाली. अहिंसेच्या सेवकांनी यवतमाळात शांततेचा मार्ग अवलंबित आंदोलन केले. यामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी न्यायासाठी बेमुदत आंदोलन केले. पतसंस्थेतील गैरप्रकाराच्या चौकशी करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यामध्ये शिक्षक सहभागी झाले होेते. सनातन या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ धरणे देण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून यवतमाळकरांनी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे बेमुदत उपोषणयवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आंतरवासिता विद्यार्थिनीशी काही गुंडांनी गैरवर्तणूक करून मारहाण केली. यापूर्वी याच परिसरात १८ आॅगस्ट रोजी आंतरवासिता डॉक्टरवर गुंडांनी चाकूहल्ला केला. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. यामुळे आंतरवासिता डॉक्टरांनी अधिष्ठाता हटावची मागणी केली. सुरक्षा व्यवस्थेसह इतर कारणांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.अस्मीच्या नेतृत्वात आंतरवासिता डॉक्टर विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. विद्यार्थिनीची छेडखाणी आणि विद्यार्थ्यांवर सतत हल्ले होत आहे. यानंतरही अधिष्ठातांनी याची कुठलीही गंभीर दखल घेतली नाही. त्यांनी सुरक्षेबाबत हात झटकले आहे. अधिष्ठातांच्या बेजबाबदारपणाने विद्यालयाच्या परिसरात गुंडांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या वेळी लाईट लावलेले नसातात. परिसरात मोठे झुडप आहे. याचाच फायदा गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती घेतात. संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला होतो. या ठिकाणची स्थिती सुधारण्यात यावी. अधिष्ठातांना हटविण्यात यावे. विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी थेट वैद्यकीय मंत्र्यांनी आश्वासन द्यावे. यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, डॉ. भूषण हाडोळे, डॉ. नेहा शेंडे, डॉ. विरेंद्र कदम, डॉ. रामदास मातने यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.सनातन संघटनेवर बंदीची मागणी यवतमाळ : सनातन संघटना सनातन प्रभातवर बंदी घालण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या नेतृत्वात बसस्थानक चौकात धरणे देण्यात आले.सनातन संघटनेचे मुख्य कार्यालय बांदोडा येथे आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली ईश्वरी राष्ट्राच्या निर्मितीसाठी आम्ही कार्य करतो असे सांगतात. अध्यात्मताच्या नावाखाली दहशतवाद, आतंकवाद पसरविण्याचे कार्य ही संघटना करीत आहे. महागांव, वाशी, ठाणे, पनवेल, मालेगाव इत्यादी ठिकाणीसुध्दा बॉम्बस्फोट केल्याचा आरोप संघटनेवर आहे. यावेळी डॉ. दिलीप महाले, प्रवीण भोयर, योगेश धानोरकर, प्रकाश डब्बावार, शैलेश गाडेकर, नंदकिशोर ठाकरे, उमेश मेश्राम, नंदकिशोर ठाकरे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा परिषद पतसंस्थेविरोधात अन्नत्याग आंदोलन यवतमाळ : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेत गत १५ वर्षापासून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करीत ठेवीदारांनी अन्नत्याग आंदोलन केले. चौकशीची मागणी लावून धरली. बुडीत संस्थेत ठेवी ठेवणे, स्वत:चे संस्थेत बेकायदेशीर गुंतवणूक करून कलम ७० चा भंग करणे, जिवंत सभासदाला मयत दाखवणे, नोकरी असून शेतकरी असल्याचे खोटे प्रतिज्ञालेख देणे, नियमबाह्य संचक अग्रीम मुदतीत न भरणे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुरूषोत्तम ठोकळ, निळकंठ कुळसंगे, प्रकाश हिवरे, विलास राठोड, महेश दत्तानी, शंकर आडे, देवा वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. (शहर वार्ताहर)