शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 16:41 IST

अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षेत अनेक शाळांची ‘दुकानदारी’ आली चव्हाट्यावर

यवतमाळ : परीक्षा म्हटले की अनेकांना घाम फुटतो; पण यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना दुसऱ्याच एका कारणामुळे घामाघूम व्हावे लागत आहे. अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.

कोरोनामुळे बोर्डाने शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले. मात्र, अनेक शाळांमध्ये योग्य इमारत, पंखे, पाण्याची सुविधा नाही. या शाळा केवळ अनुदानापुरत्या सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी त्यांना आपल्या शाळेत केंद्र द्यावे लागले आणि त्यातूनच त्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आली आहे.

अनेकांना आली भोवळ

काही जिल्ह्यांमध्ये इमारती नसल्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा चक्क गोदामात घेतल्याचे प्रकार पुढे येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात असा प्रकार नसला तरी बऱ्याच शाळांकडे योग्य इमारत नसल्याचा प्रकार आहे. तेथे प्रचंड उकाडा सहन करीत पेपर सोडविताना काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याचे प्रकार घडले आहेत.

कमी पटाच्या शाळांची बनवाबनवी

शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले जाणार असले तरी त्यासाठी जादा पटसंख्येची अट ठेवण्यात आली, त्यामुळे ज्या शाळांकडे नियमाप्रमाणे सोयीसुविधा नाही, त्यांनी या अटीचा अचूक फायदा घेऊन आपली बनवाबनवी लपविली.

१५ पेक्षा कमी पट असलेल्या शाळेतील परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात जोडण्यात येणार आहे. हे कळताच सुविधा नसलेल्या शाळांनीही आपल्याकडे कमी पट असल्याची बतावणी करून आपले परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात पाठवून दिले.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

सुविधा नसलेल्या शाळांमध्ये परीक्षार्थ्यांचे हाल होत आहे. मात्र, परीक्षेच्या काळात अभ्यास करावा की तक्रारी कराव्या, या विचारातून विद्यार्थी व त्यांचे पालक गप्प आहेत. परीक्षेमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागत आहे.

आपल्या जिल्ह्यातील केवळ एका शाळेची केस आपल्यापर्यंत आली होती. त्यांच्या शाळेचे छत वादळी पावसात उडून गेले आहे, त्यामुळे तेथे परीक्षा केंद्र देऊ नये, अशी विनंती या शाळेनेच केली होती. म्हणून आपण तेथे दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र न देता तेथील विद्यार्थी जवळच्या मुख्य परीक्षा केंद्राला जोडून दिले. सोयीसुविधा पाहूनच आपण परीक्षा केंद्र दिले आहे.

-डाॅ. जयश्री राऊत-घारफळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी