शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 16:41 IST

अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षेत अनेक शाळांची ‘दुकानदारी’ आली चव्हाट्यावर

यवतमाळ : परीक्षा म्हटले की अनेकांना घाम फुटतो; पण यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना दुसऱ्याच एका कारणामुळे घामाघूम व्हावे लागत आहे. अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.

कोरोनामुळे बोर्डाने शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले. मात्र, अनेक शाळांमध्ये योग्य इमारत, पंखे, पाण्याची सुविधा नाही. या शाळा केवळ अनुदानापुरत्या सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी त्यांना आपल्या शाळेत केंद्र द्यावे लागले आणि त्यातूनच त्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आली आहे.

अनेकांना आली भोवळ

काही जिल्ह्यांमध्ये इमारती नसल्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा चक्क गोदामात घेतल्याचे प्रकार पुढे येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात असा प्रकार नसला तरी बऱ्याच शाळांकडे योग्य इमारत नसल्याचा प्रकार आहे. तेथे प्रचंड उकाडा सहन करीत पेपर सोडविताना काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याचे प्रकार घडले आहेत.

कमी पटाच्या शाळांची बनवाबनवी

शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले जाणार असले तरी त्यासाठी जादा पटसंख्येची अट ठेवण्यात आली, त्यामुळे ज्या शाळांकडे नियमाप्रमाणे सोयीसुविधा नाही, त्यांनी या अटीचा अचूक फायदा घेऊन आपली बनवाबनवी लपविली.

१५ पेक्षा कमी पट असलेल्या शाळेतील परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात जोडण्यात येणार आहे. हे कळताच सुविधा नसलेल्या शाळांनीही आपल्याकडे कमी पट असल्याची बतावणी करून आपले परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात पाठवून दिले.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

सुविधा नसलेल्या शाळांमध्ये परीक्षार्थ्यांचे हाल होत आहे. मात्र, परीक्षेच्या काळात अभ्यास करावा की तक्रारी कराव्या, या विचारातून विद्यार्थी व त्यांचे पालक गप्प आहेत. परीक्षेमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागत आहे.

आपल्या जिल्ह्यातील केवळ एका शाळेची केस आपल्यापर्यंत आली होती. त्यांच्या शाळेचे छत वादळी पावसात उडून गेले आहे, त्यामुळे तेथे परीक्षा केंद्र देऊ नये, अशी विनंती या शाळेनेच केली होती. म्हणून आपण तेथे दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र न देता तेथील विद्यार्थी जवळच्या मुख्य परीक्षा केंद्राला जोडून दिले. सोयीसुविधा पाहूनच आपण परीक्षा केंद्र दिले आहे.

-डाॅ. जयश्री राऊत-घारफळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी