शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तट्ट्याच्या भिंती अन् टीनपत्राचे छत.. पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 16:41 IST

अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षेत अनेक शाळांची ‘दुकानदारी’ आली चव्हाट्यावर

यवतमाळ : परीक्षा म्हटले की अनेकांना घाम फुटतो; पण यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना दुसऱ्याच एका कारणामुळे घामाघूम व्हावे लागत आहे. अनेक शाळांनी केवळ तट्ट्याच्या भिंती आणि टीनपत्र्याचे छत एवढीच सुविधा असताना परीक्षा केंद्र स्वीकारले. तेथे ४० अंश तापमानात बसून पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे.

कोरोनामुळे बोर्डाने शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले. मात्र, अनेक शाळांमध्ये योग्य इमारत, पंखे, पाण्याची सुविधा नाही. या शाळा केवळ अनुदानापुरत्या सुरू ठेवल्या जात आहेत. मात्र, दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी त्यांना आपल्या शाळेत केंद्र द्यावे लागले आणि त्यातूनच त्यांची ‘दुकानदारी’ चव्हाट्यावर आली आहे.

अनेकांना आली भोवळ

काही जिल्ह्यांमध्ये इमारती नसल्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा चक्क गोदामात घेतल्याचे प्रकार पुढे येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात असा प्रकार नसला तरी बऱ्याच शाळांकडे योग्य इमारत नसल्याचा प्रकार आहे. तेथे प्रचंड उकाडा सहन करीत पेपर सोडविताना काही विद्यार्थ्यांना भोवळ आल्याचे प्रकार घडले आहेत.

कमी पटाच्या शाळांची बनवाबनवी

शाळा तेथे परीक्षा केंद्र दिले जाणार असले तरी त्यासाठी जादा पटसंख्येची अट ठेवण्यात आली, त्यामुळे ज्या शाळांकडे नियमाप्रमाणे सोयीसुविधा नाही, त्यांनी या अटीचा अचूक फायदा घेऊन आपली बनवाबनवी लपविली.

१५ पेक्षा कमी पट असलेल्या शाळेतील परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात जोडण्यात येणार आहे. हे कळताच सुविधा नसलेल्या शाळांनीही आपल्याकडे कमी पट असल्याची बतावणी करून आपले परीक्षार्थी दुसऱ्या केंद्रात पाठवून दिले.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार

सुविधा नसलेल्या शाळांमध्ये परीक्षार्थ्यांचे हाल होत आहे. मात्र, परीक्षेच्या काळात अभ्यास करावा की तक्रारी कराव्या, या विचारातून विद्यार्थी व त्यांचे पालक गप्प आहेत. परीक्षेमुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार त्यांना सहन करावा लागत आहे.

आपल्या जिल्ह्यातील केवळ एका शाळेची केस आपल्यापर्यंत आली होती. त्यांच्या शाळेचे छत वादळी पावसात उडून गेले आहे, त्यामुळे तेथे परीक्षा केंद्र देऊ नये, अशी विनंती या शाळेनेच केली होती. म्हणून आपण तेथे दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र न देता तेथील विद्यार्थी जवळच्या मुख्य परीक्षा केंद्राला जोडून दिले. सोयीसुविधा पाहूनच आपण परीक्षा केंद्र दिले आहे.

-डाॅ. जयश्री राऊत-घारफळकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी